पुण्यातील ट्राफिक
ट्राफिक ध्वनिप्रदूषण, आणि वायुप्रदूषण काही अंशी आटोक्यात येऊ शकतं..
मला ज्या काही कल्पना सुचल्या आहेत. त्या मी इथे देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा त्यात भर घालू शकता. हे उपाय म्हणजे सगळं काही आहे असं नाही, पण यातून नक्कीच काहीतरी सकारात्मक मार्ग निघू शकतील असं मला वाटतय.
मला ज्या काही कल्पना सुचल्या आहेत. त्या मी इथे देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा त्यात भर घालू शकता. हे उपाय म्हणजे सगळं काही आहे असं नाही, पण यातून नक्कीच काहीतरी सकारात्मक मार्ग निघू शकतील असं मला वाटतय.
१) पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आणि.. पुण्यात जेवढे सरकारी ऑफिसेस आहेत. मग ते राज्य सरकारी असो अथवा केंद्राची असोत. याठिकाणी काम करत असणाऱ्या प्रत्येक तरुण ( म्हणजे पन्नाशीच्या आतील ) कर्मचाऱ्याला सायकलवरून कामाला येणं बंधनकारक केलं पाहिजे. यापासून बरेच फायदे आहेत.. फुकटचा व्यायाम होतो, इंधन बचत होते, पर्यायने नकळत पैसे सुद्धा वाचतात, ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
आणि मुख्य म्हणजे.. अपघाताचं प्रमाण देखील कमी होईल.
फारच थकलेल्या, वृद्ध, दिव्यांग आणि आजारी कर्मचाऱ्यांना सरकारी वाहनाने ऑफिसमध्ये येण्याचा अध्यादेश काढला पाहिजे. यामुळे वाहतूक कोंडी, वायू आणि ध्वनीप्रदूषण नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.
( परंतु याकरिता, सरकारने स्पेशल सायकल ट्रॅक निर्माण करून देणं फार गरजेचं आहे. नाही म्हणता, पुण्यातील काही भागात हि सोय उपलब्ध आहे. )
आणि मुख्य म्हणजे.. अपघाताचं प्रमाण देखील कमी होईल.
फारच थकलेल्या, वृद्ध, दिव्यांग आणि आजारी कर्मचाऱ्यांना सरकारी वाहनाने ऑफिसमध्ये येण्याचा अध्यादेश काढला पाहिजे. यामुळे वाहतूक कोंडी, वायू आणि ध्वनीप्रदूषण नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.
( परंतु याकरिता, सरकारने स्पेशल सायकल ट्रॅक निर्माण करून देणं फार गरजेचं आहे. नाही म्हणता, पुण्यातील काही भागात हि सोय उपलब्ध आहे. )
२) कारमध्ये किमान तीन व्यक्ती ( ड्रायव्हर धरून ) असायलाच हव्यात. यापेक्षा कमी प्रवाशी असणाऱ्या कार रसत्यावर येता कामा नये. आल्याच तर त्यांच्यावर फार मोठी दंडात्मक कारवाई करण्यात यावी. हायर कॅबला सुद्धा अशाच प्रकारचे नियम लावले गेले पाहिजेत. ( तुम्ही #कार घेतली म्हणजे, ट्राफिक जाम करून लोकांच्या डोक्याला #कार केलाच पाहिजे. असा काही नियम नाहीये. )
३ ) ट्राफिक सिंग्नल, आणि नियमांचं वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांचा वाहन परवाना ( गुन्हा असेल तशी शिक्षा.. तीन महिने, सहा महिने, वर्षभर, किंवा कायमस्वरूपी.. ) रद्द करण्यासाखे कठोर नियम निर्माण केले गेले पाहिजे. अशा कारवाई झालेल्या व्यक्ती पुन्हा वाहन चालवताना आढळून आल्या, तर त्यांना किमान दहा दिवसांची जेल वारी आणि फार मोठा दंड आकारला गेला पाहिजे. त्याशिवाय जनमानसात याची जरब बसणार नाही.
४ ) बिल्डिंगमध्ये किंवा राहत्या घरी पार्किंगची सोय असणाऱ्या व्यक्तींनाच दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली पाहिजे. त्यामुळे रस्त्यावर होणारं पार्किंग, आणि पर्यायाने होणारी रस्ता कोंडी कमी होण्यास मदत होईल. आणि अर्थातच.. त्यामुळे रस्त्यावर सुद्धा जास्ती वाहनं येणार नाहीत.
५ ) प्रत्येक शहरामध्ये.. तेथील स्थानिक चारचाकी वाहनांना ( पुणे एम.एच. १२ आणि १४ ) व्यवसाय करण्यास परवानगी दिली पाहिजे. बाहेर गावातील वाहनांना फक्त बाहेरून ट्रीप घेऊन येण्यासाठीच ठराविक दिवसांची परवानगी द्यावी. त्यांना कायमस्वरूपी वास्तव्यास किंवा व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात यावा.
६ ) हॉर्न पद्धत पूर्णपणे बंद केली गेली पाहिजे, कारण हा फारच कर्कश्य विषय आहे. यापासून कोणत्याच प्रकारचा फायदा होत नाही. वाहतूक कोंडी झाल्यावर देखील काही व्यक्ती मुर्खासारखे हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे हा विषय पूर्णपणे बंद केला गेला पाहिजे.
बुलेट सारख्या दुचाकींना, फटाका फुटल्या सारखा आवाज काढला जातो. हा प्रकार आढळून आल्यास, गाडी जागेवर जप्त करण्यात आली पाहिजे. बाईकवर ट्रिपल सीट असणाऱ्या मुलांना, कठोरतील कठोर शासन करण्यात आलं पाहिजे.
बुलेट सारख्या दुचाकींना, फटाका फुटल्या सारखा आवाज काढला जातो. हा प्रकार आढळून आल्यास, गाडी जागेवर जप्त करण्यात आली पाहिजे. बाईकवर ट्रिपल सीट असणाऱ्या मुलांना, कठोरतील कठोर शासन करण्यात आलं पाहिजे.
७ ) प्रत्येक कॅब चालकांचा.. बॅच आणि लायसन्स तपासणी केली पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे.. सर्रास कॅब चालकांकडे प्रवासी वाहतुकीचे बॅच नाहीयेत. याची कसून तपासणी आणि दंडात्मक कारवाई केली गेली पाहिजे. यामुळे सुद्धा रस्त्यावर गाड्यांची गर्दी कमी होऊ शकते. कारण बॅच काढणं काही सोपं काम नाही. त्याकरिता सगळे पेपर्स क्लियर असावे लागतात. व्हेईकल ट्रायल व्यवस्थितपणे द्यावी लागते, प्रवासी वाहतूक करण्यासाठी हा विषय फार महत्वाचा आहे. पण हा विषय कोणीही गांभीर्याने घेत नाही. असं आढळून येत आहे.
८ ) महारष्ट्रातील किंवा देशातील प्रत्येक भागात आयटी सेक्टर निर्माण केले गेले पाहिजेत. म्हणजे स्थानिक तरुणांचा शहराकडे होणारा वाढता प्रवाह काही अंशी तरी कमी होण्यास मदत मिळेल. आणि इतर छोटीमोठी गावं सुद्धा दृष्टीक्षेपात येण्यास मदत होईल. पर्यायाने बाहेरून कोणी आलं नाही, तर.. शहरातील वाहतूक आणि गर्दी वाढणार नाही. सगळ्या सुविधा किंवा नोकऱ्या आपल्याच गावात मिळाल्या, तर कोणता मायचा लाल दुसऱ्या गावात नोकरीसाठी जाईल.?
९ ) कोणत्याही प्रवाशाने रिक्षामध्ये, तीन सीट्सच्या वर बसूच नये. भले थोडा उशीर होऊद्यात, थोडी कळ सहन करा, पण रिक्षामध्ये दाटीवाटीने बिलकुल जाऊ नका. लागल्यास दोन पैसे जास्ती घे म्हणावं, पण आपल्या निर्णयावर ठाम राहा. कारण.. अतिरिक्त भार झाल्याने सुद्धा, रिक्षा किंवा तत्सम वाहनं धूर ओकू लागतात. तसेच.. पीएमपीएमएल, एसटी, सारख्या सरकारी वाहनात सुद्धा क्षमतेपेक्षा जास्ती लोकांनी प्रवास करू नये.
१० ) पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या वाहनांना.. अगदी शोधून जप्त करा. तडजोड करून वाहनं सोडू नका, अशी सक्त ताकीद प्रत्येक पोलीस ऑफिसरला दिली गेली पाहिजे, त्यामुळे सुद्धा रस्त्यावरील भरपूर वाहनं कमी होतील. धूर ओकणाऱ्या प्रत्येक वाहनाला.. मग ते जुनं असो अथवा नवं. जप्ती किंवा फार मोठ्या आकाराचे दंड ठोठावले गेले पाहिजे. म्हणजे.. तशी वाहने रस्त्यावर येण्यासाठी धजावणार नाहीत.
हे काही पर्याय मला सुचले आहेत, नाही म्हणता.. खरं तर मी फारच कठोर भूमिका घेतली आहे. पण आजच्याला याशिवाय पर्याय नाहीये. कारण, आजवरच्या सौम्य कारवायांना पब्लिकने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आम्ही रोज मरतोय, पण या नियमांचं उल्लंघन करणारे मनसोक्त आनंद उपभोगत आहेत.
कोणीतरी याची दखल घेतली पाहिजे. नाहीतर पुण्यात किंवा इतर मोठ्या शहरात लोकांचं जिनं अगदी मुश्कील होऊन जाईल. असंही आज ते होतच आहे म्हणा, पण त्यात आणखीन भर पडेल हे नक्की..
कोणीतरी याची दखल घेतली पाहिजे. नाहीतर पुण्यात किंवा इतर मोठ्या शहरात लोकांचं जिनं अगदी मुश्कील होऊन जाईल. असंही आज ते होतच आहे म्हणा, पण त्यात आणखीन भर पडेल हे नक्की..
No comments:
Post a Comment