#कॉपी..
मुलांनो.. कॉपीचं स्पेलिंग सांगा.? KOPY मुलांच्या या चुकीच्या उत्तरावर, मास्तराने हातावर छडी मारल्याचा जोरदार आवाज ऐकवलाय. कॉपी सिनेमाच्या अगदी सुरवातीचा हा न दिसणारा, म्हणजे फक्त ऐकू येणारा सीन आहे. यातून त्यांना हेच सांगायचं असावं.. कि,
छडी लागे छमछम.. आणि, विद्या येई घमघम..!
आज मी हा सिनेमा पाहायला गेलो.. आणि पाहतो तर काय, हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात, आम्ही फक्त तीनच जन होतो. मराठी सिनेमांना थियेटर उपलब्ध करून द्या म्हणून चळवळ उभारणारी लोकं आपल्या इथे भरपूर आहेत. पण हि चळवळ उभी राहिल्या नंतर.. ते मराठी सिनेमे पाहायला प्रेक्षकवर्ग हवा कि नको.?
वादाला तोंड फुटू नये म्हणून.. काही सिनेमागृहात मराठी सिनेमे दाखवले देखील जातात. पण प्रेक्षकांनी अशा सिनेमांकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवल्यावर, त्या थियेटर मालकाने, किंवा निर्मात्याने तरी काय करावं.? म्हणजे.. सामाजिकदृष्ट्या सक्षम असणारे चित्रपट कोणी बनवूच नये, किंवा त्या फंदात कोणी पडूच नये. असाच त्याचा सरळसरळ अर्थ होतोय.
वादाला तोंड फुटू नये म्हणून.. काही सिनेमागृहात मराठी सिनेमे दाखवले देखील जातात. पण प्रेक्षकांनी अशा सिनेमांकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवल्यावर, त्या थियेटर मालकाने, किंवा निर्मात्याने तरी काय करावं.? म्हणजे.. सामाजिकदृष्ट्या सक्षम असणारे चित्रपट कोणी बनवूच नये, किंवा त्या फंदात कोणी पडूच नये. असाच त्याचा सरळसरळ अर्थ होतोय.
कॉपी.. या सिनेमाचा विषय तसा खूप विचार करायला लावणारा आहे. पण चित्रपटाची बांधणी थोडी चुकल्यामुळे, हा सिनेमा मध्यंतरानंतर काहीसा रटाळवाणा झाला आहे.
कॉपी करून विध्यार्थी कसे पास होतात, किंवा.. स्वतः शिक्षक मंडळीच आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के कसा लागेल. म्हणून, परीक्षेदरम्यान मुलांना कॉपी करण्याची सरळसरळ सूट कसे देतात. किंवा.. शाळेतील काही शिक्षक, आपल्या खासगी शिकवण्यांची खळगी भरण्यासाठी, शाळेतील मुलांना ठीकसं शिकवण्यात कशी असमर्थता दाखवतात. काही शिक्षणसम्राट मंडळी, शिक्षणसंस्था उघडून त्याचा मलिदा कसा लाटतात, आणि पर्यायाने शिक्षक वृदांना कसं वेठीस धरतात. अशा सर्व विषयांवर भाष्य करणारा ग्रामीण ढंगातील हा सिनेमा आहे.
कॉपी करून विध्यार्थी कसे पास होतात, किंवा.. स्वतः शिक्षक मंडळीच आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के कसा लागेल. म्हणून, परीक्षेदरम्यान मुलांना कॉपी करण्याची सरळसरळ सूट कसे देतात. किंवा.. शाळेतील काही शिक्षक, आपल्या खासगी शिकवण्यांची खळगी भरण्यासाठी, शाळेतील मुलांना ठीकसं शिकवण्यात कशी असमर्थता दाखवतात. काही शिक्षणसम्राट मंडळी, शिक्षणसंस्था उघडून त्याचा मलिदा कसा लाटतात, आणि पर्यायाने शिक्षक वृदांना कसं वेठीस धरतात. अशा सर्व विषयांवर भाष्य करणारा ग्रामीण ढंगातील हा सिनेमा आहे.
नेहेमीप्रमाणे.. गरीब घरातील गरजू विध्यार्थी. आणि, आणि श्रीमंत घरातील मुजोर विध्यार्थी, तसेच.. निव्वळ ग्रामीण भागातील शाळेतून परीक्षा दिल्याने ( अर्थात कॉपी करण्याची सूट दिली जातेय म्हणून. ) दहावीत मोठ्या टक्क्याने पास होऊ अशी अशा बाळगून, पुण्यातून ग्रामीण भागात शिकायला गेलेली मुलगी. आणि त्याच बरोबर.. ग्रामीण भागातील तीन विध्यार्थी, ज्यांना शिक्षणाची आवड असून सुद्धा, त्यांना शिक्षण घेण्यात कशा अडचणी येतात. त्यावर मेहनत करून मात करणारे विध्यार्थी, आणि.. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन शिक्षकांनी, त्या तीन गरजू मुलांना सोबत घेऊन दिलेला अयशस्वी लढा. असा काहीसा सिनेमाचा मूळ गाभा आहे.
प्रत्येक सिनेमात शेवटी नायकाचा विजय होत असतो.. पण या सिनेमात, नायक असणारी तीन मुलं, पैकी एक मुलगा या शिक्षणपद्धतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. तर उर्वरित दोन विध्यार्थी आणि दोन शिक्षक या विषयाला वाचा फोडण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. पण त्याचा काहीएक उपयोग होत नाही. आणि या लढ्याचं बक्षीस म्हणून.. त्या दोन्ही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई होते. तर शेवटला..सैराट सिनेमा टाईप, लढा देणाऱ्यांपैकी एक विध्यार्थिनी.. त्या शिक्षण सम्राटाच्या तोंडावर ( कॅमेऱ्यावर ) थुंकते. असा काहीसा सिनेमाचा शेवट दाखवण्यात आला आहे.
मराठी सिनेमात येणारा तोच तोचपणा.. आपल्या मराठी सिनेसृष्टीला कुठेतरी घातक ठरतोय. असं मला तरी हा सिनेमा पाहून जाणवलं. परंतु काही अंशी.. सिनेमाचा शेवट सोडला तर, एका चांगल्या विषयाची सुरवात किंवा मुहूर्तमेढ म्हणून अगदी डोळसपणे या सिनेमाकडे प्रत्येक सिने रसिकाने पाहायला हवंय, असं सुद्धा मला वाटून जातं.
पण सत्य परिस्थिती काहीशी गंभीर आणि वेगळी आहे. टकाटक सारखे मादक सिनेमे पाहायला चटावलेल्या मराठी प्रेक्षकांना, अशा प्रकारच्या सामाजिक विषयाकडे आपण कसं वळवू शकू.?
किंवा याचं योग्यप्रकारे मार्केटिंग करण्यात आपण कसे यशस्वी होऊ.? हा आजच्या मराठी सिनेनिर्मात्यांसाठी फार मोठा पैजेचा विडा आहे.!
पण सत्य परिस्थिती काहीशी गंभीर आणि वेगळी आहे. टकाटक सारखे मादक सिनेमे पाहायला चटावलेल्या मराठी प्रेक्षकांना, अशा प्रकारच्या सामाजिक विषयाकडे आपण कसं वळवू शकू.?
किंवा याचं योग्यप्रकारे मार्केटिंग करण्यात आपण कसे यशस्वी होऊ.? हा आजच्या मराठी सिनेनिर्मात्यांसाठी फार मोठा पैजेचा विडा आहे.!
या सिनेमाचे दिग्दर्शक.. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे आहेत. तर.. सिनेमातील शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे, जगन्नाथ निवंगुणे आणि शिक्षण अधिकारी असलेल्या कमलेश सावंत यांनी आपल्या भूमिका उत्तमरित्या साकारल्या आहेत. सिनेमाची दिग्दर्शकीय मांडणी काहीशी ढिसाळ झाली असली तरी सिनेमाचा मूळ विषय आणि त्याची दाहकता प्रेक्षकांपर्यंत अचूक पोहोचते. शिवा (प्रतीक लाड), प्रकाश (अज्ञेश मदूशिंगरकर), प्रिया (श्रद्धा सावंत) या बालकलाकारांनी सुद्धा या सिनेमात उत्तम भूमिका साकारल्या आहेत. सिनेमातील दोन्ही गीतं खूपच सुंदर आणि श्रवणीय आहेत.
No comments:
Post a Comment