माझा एक समवयस्क मित्र...
त्याकाळी, तो भारतीय सैन्यात दाखल झाला होता. त्यापाठीमागचं कारण एकच, सैन्यातील नोकरी म्हणजे बक्कळ पगार. आणि, त्याचबरोबर इतर सुद्धा बऱ्याच सुख सुविधा मिळतात. ( हे त्याचं मत )
मला चांगलं आठवतंय.. आमच्या गावातील एक सदगृहस्थ, मला त्यावेळी म्हणाले होते.
त्याकाळी, तो भारतीय सैन्यात दाखल झाला होता. त्यापाठीमागचं कारण एकच, सैन्यातील नोकरी म्हणजे बक्कळ पगार. आणि, त्याचबरोबर इतर सुद्धा बऱ्याच सुख सुविधा मिळतात. ( हे त्याचं मत )
मला चांगलं आठवतंय.. आमच्या गावातील एक सदगृहस्थ, मला त्यावेळी म्हणाले होते.
" अरे.. तुला पैसाच कमवायचा असेल. तर, सैन्यात भरती हो. तिथे गेल्यावर, आपल्याला काहीच खर्च नसतो. जेवण खाणं आणि राहणं सगळं तिकडेच अगदी मोफत होतं. आणि, आपला सगळा पैसा तसाच शिलकी पडतो..! "
नाही म्हणता.. मला सुद्धा, सैन्यात भरती होण्याची खूप हौस होती. पैश्याकरिता नाही, तर त्या तरुण वयात, माझ्या मनात एक वेगळच देश प्रेमाचं वारं दौडत होतं. आणि, त्या वेडापायी एकदा तर मी चक्क सैन्यात भरती होण्यासाठी सुद्धा गेलो होतो. पण, माझ्या दुर्दैवाने त्या ठिकाणी माझी 'उंची' मला आड आली..
भरती प्रक्रियेच्या सुरवातीलाच. भला मोठा तरुण जनसमुदाय पाहून..
त्यांनी, त्या मैदानात एक विशिष्ट उंचीची चौकट उभी केली. त्या चौकटीत जो अडकेल, त्यालाच पुढे चाल होती. आणि, दुर्दैवाने नेमका मी त्या चौकटीत अडकलो नाही. माझ्या सोबतच, मुलांनी भरलेलं निम्मं अर्धं मैदान सुद्धा अगदी जागीच रिकामं झालं होतं.
आणि.. त्यावेळी मला, सरळ घरचा रस्ता धरावा लागला होता. कोवळ्या वयात.. माझ्या सारख्या देशप्रेमी मुलाला तो आघात सहन होणारा नव्हता.
" पण.. ना इलाजापुढे काय इलाज..? "
असं म्हणून, पुन्हा फिरून मी कधीही त्या सैन्य भरतीला गेलो नाही.
भरती प्रक्रियेच्या सुरवातीलाच. भला मोठा तरुण जनसमुदाय पाहून..
त्यांनी, त्या मैदानात एक विशिष्ट उंचीची चौकट उभी केली. त्या चौकटीत जो अडकेल, त्यालाच पुढे चाल होती. आणि, दुर्दैवाने नेमका मी त्या चौकटीत अडकलो नाही. माझ्या सोबतच, मुलांनी भरलेलं निम्मं अर्धं मैदान सुद्धा अगदी जागीच रिकामं झालं होतं.
आणि.. त्यावेळी मला, सरळ घरचा रस्ता धरावा लागला होता. कोवळ्या वयात.. माझ्या सारख्या देशप्रेमी मुलाला तो आघात सहन होणारा नव्हता.
" पण.. ना इलाजापुढे काय इलाज..? "
असं म्हणून, पुन्हा फिरून मी कधीही त्या सैन्य भरतीला गेलो नाही.
तर.. तुम्हाला मी माझ्या मिलेट्री मध्ये असणाऱ्या मित्राबरोबर घडलेली एक रंजक कथा ऐकवतो. जो त्याकाळी, सैन्यात भरती झाला होता. आज, तो ही सैन्यातून सेवानिवृत्त म्हणून सुखविलासी जीवन व्यतीत करत आहे..
तर.. त्याकाळी, सैन्यात भरती झाल्यानंतर. त्यांना, रोजच्या परेड आणि सैनिकी विद्या शिकवणे चालू असायचं. जवळ-जवळ वर्षभर त्यांना ह्या हिकमती कराव्या लागल्या. पण, सैन्यात गेलोच आहे. तर, ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. म्हणून, तो ते सर्व काही निमूटपणे सहन करत होता. पहाटे पाचला उठणे, स्विमिंग, रनिंग, परेड, आणि.. इतर बऱ्याच कसरती त्यांच्याकडून करून घेतल्या जात असत..
असे बरेच दिवस गेले. आणि, एक दिवशी..सकाळची परेड झाली. नाश्ता पाणी उरकल्यावर, सर्व जवानांना एका लाईनीत उभं केलं गेलं. आणि, त्याच्या कप्तानाने त्यांना आदेश दिला..
तर.. त्याकाळी, सैन्यात भरती झाल्यानंतर. त्यांना, रोजच्या परेड आणि सैनिकी विद्या शिकवणे चालू असायचं. जवळ-जवळ वर्षभर त्यांना ह्या हिकमती कराव्या लागल्या. पण, सैन्यात गेलोच आहे. तर, ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार आहे. म्हणून, तो ते सर्व काही निमूटपणे सहन करत होता. पहाटे पाचला उठणे, स्विमिंग, रनिंग, परेड, आणि.. इतर बऱ्याच कसरती त्यांच्याकडून करून घेतल्या जात असत..
असे बरेच दिवस गेले. आणि, एक दिवशी..सकाळची परेड झाली. नाश्ता पाणी उरकल्यावर, सर्व जवानांना एका लाईनीत उभं केलं गेलं. आणि, त्याच्या कप्तानाने त्यांना आदेश दिला..
" जल्दीसे जाओ, और अपनी-अपनी तलवारे लेकर आओ...! "
तलवार हा शब्द ऐकताच, ह्याच्या अंगातले होते नव्हते तेवढे त्राणच नाहीसे झाले. त्याच्या मनात, नाना प्रकारचे विचार येऊ लागले...
आयला.. हे जर मला सुरवातीला माहिती असतं, कि सैन्यात समोरासमोर तलवारीने सुद्धा लढाई करावी लागत असते. तर, मी कशाला झक मारायला भरती झालो असतो राव. लांबून गोळ्या मारणं ठीक आहे हो. पण हे, तलवारीचं नाटक कोणी काढलं असावं..? जुन्या काळात, हे सगळं ठीक होतं. पण हे काय आता नवीनच..
असा विचार करता-करता, त्याच्या मनपटलावर.. रामायण, महाभारतातील तलवारीचं द्वंद्व युद्ध दिसू लागलं. हा याच्या युद्ध विचारात पूर्ण बुडून गेला होता.. तितक्यात. त्याला त्यांच्या कप्तानाचा आवाज आला.
आयला.. हे जर मला सुरवातीला माहिती असतं, कि सैन्यात समोरासमोर तलवारीने सुद्धा लढाई करावी लागत असते. तर, मी कशाला झक मारायला भरती झालो असतो राव. लांबून गोळ्या मारणं ठीक आहे हो. पण हे, तलवारीचं नाटक कोणी काढलं असावं..? जुन्या काळात, हे सगळं ठीक होतं. पण हे काय आता नवीनच..
असा विचार करता-करता, त्याच्या मनपटलावर.. रामायण, महाभारतातील तलवारीचं द्वंद्व युद्ध दिसू लागलं. हा याच्या युद्ध विचारात पूर्ण बुडून गेला होता.. तितक्यात. त्याला त्यांच्या कप्तानाचा आवाज आला.
" तुम क्यो खडे हो..? तुम्हे क्या अलगसे ऑर्डर देणा पडेगा क्या..? "
तेंव्हा कुठे, तो स्वप्नातून सत्यात आला. आणि, इतर जवानांच्या मागोमाग निघून गेला. त्याच्या मनाची काही तयारी होत नव्हती. परंतु तो बळेबळेच, त्या तलवारी ठेवलेल्या खोलीमध्ये गेला..
आणि.. " हसतमुखाने " एक तलवार हातात घेत, तो त्या रुमच्या बाहेर पडला..
कारण, ती तलवार म्हणजे...
गवत कापण्याचं, एक तलवारी सदृश्य अवजार होतं. आणि, आता त्यांना मैदानातील वाढलेलं गाजर गवत कापणी करिता निघायचं होतं..!
आणि.. " हसतमुखाने " एक तलवार हातात घेत, तो त्या रुमच्या बाहेर पडला..
कारण, ती तलवार म्हणजे...
गवत कापण्याचं, एक तलवारी सदृश्य अवजार होतं. आणि, आता त्यांना मैदानातील वाढलेलं गाजर गवत कापणी करिता निघायचं होतं..!
No comments:
Post a Comment