Saturday, 26 August 2017

वाहन चालवताना..
एकवेळ, अल्प प्रमाणात दारू पिलेल्या व्यक्तीकडून अपघात घडनं टळलं जाऊ शकतं.
परंतु.. सर्दी झालेल्या वाहन चालक व्यक्तीपासून, आपल्याला अपघाताचा जास्तीचा धोका होऊ शकतो.
कारण..
सर्दी झालेल्या व्यक्तीला वारंवार शिंक येत असते. आणि शिंक आल्यावर, काही सेकंदासाठी आपले डोळे झाकले जातात. आणि, आपल्याकडून सगळ्या क्रिया आपोआप बंद पडतात. आणि आपलं सगळं लक्ष त्या शिंकेकडे एकवटलं जातं. हे सगळं काही, अगदी एका सेकंदात घडून जात असतं. आणि अपघात हा सुद्धा काही सेकंदातच घडत असतो. शिंक सुद्धा काही सांगून येत नसते. आणि अपघात प्रवण स्थळ सुद्धा अगदी अचानक आपल्या समोर येत असतं.
शिंक आल्यावर आपण कितीही प्रयत्न केले. तरी, आपले डोळे उघडे राहू शकत नाही. आणि आपलं चित्तही एका ठिकाणावर स्थिर राहत नाही. हवं तर, एकदा प्रयत्न करून पाहा..!
बी केअरफुल. 

No comments:

Post a Comment