Monday, 4 January 2016

पूर्वी विवाह समारंभात...
साखरपुडा, हळदी, आणि नंतर विवाह सोहळा सगळं काही एकाच मांडवात पार पाडलं जायचं. पण हल्ली बरीच मंडळी, लग्न ठरवून झालं. कि, विवाह मुहूर्त येईपर्यंत म्हणा. किंवा, कार्यालयाची तारीख मिळेपर्यंत म्हणा. मुलाची किंवा मुलीची " एडवांस बुकिंग " म्हणून, साखरपुडा करून ठेवतात. काही भागात, याला टिळा सुद्धा म्हंटलं जातं. हि पद्धत म्हणजे, एकप्रकारची गुंतवण असते. परंतु, अशाप्रकारच्या साखरपुडा किंवा टिळा ह्या विषयाला, माझा पुर्णपणे विरोध आहे. विषय फार गंभीर आहे.
तसं पाहायला गेलं तर..
" या साखरपुड्याचे, फायदे कमी आणि तोटेच जास्ती आहेत..! "
१) पाहिली गोष्ट म्हणजे, हल्ली साखरपुडा हा एक प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. मुलीच्या वडिलांची ऐपत न पाहता. साखरपुड्याचा जोरदार 'खर्चिक' कार्यक्रम पार पाडला जातो. माझ्या माहिती प्रमाणे, या समारंभात गरीबाची दोन लग्न होतील. ईतका खर्च झालेला असतो. तर काही ठिकाणी हा कार्यक्रम आटोपशीर सुद्धा उरकला जातो. कालच एकाच्या तोंडून ऐकण्यात आलं. मुलाकडच्या लोकांचा निरोप होता. साखरपुडा तारांकित हॉटेलात पार पडला पाहिजे. आणि, आमची दीडहजार माणसं येणार आहेत. मुबलक पैसे असणाऱ्या लोकांना ते जमून जातं. ह्या अशा नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत..
२ ) साखरपुडा झाल्या नंतर, मुलं काही गप्प बसत नाहीत. त्या कार्यक्रमातच, त्यांची एकमेकाच्या मोबाईल नंबरची देवान घेवाण झालेली असते. आणि, मुला मुलीची लगेच फोनाफोनी सुरु होते. काही दिवसांनी, फोनाफोनीचं भेटीत रुपांतर होतं. नंतर जवळीक वाढू लागते. शरीर स्पर्श होऊ लागतात. आणि चुकून काहीवेळा, लग्नाआधीच दोघांकडून नको ती 'चूक' सुद्धा घडून जाते बरं का.. अशावेळी, दोघांनीही ती घडलेली चूक मान्य करून. पुढील वैवाहिक जीवनात सुखी आणि समाधानी राहायचं ठरवलं. तर, काही हरकत नाही. पण काहीवेळा असं सुद्धा पाहायला मिळालं आहे. मुलगा अचानक पलटी मारतो. आणि म्हणू लागतो.. हिने त्या गोष्टीसाठी मला होकारच कसा दिला..? तिचा तिच्या मनावर ताबा नव्हता का..? मला तर वाटतंय, हि पूर्वीपासून बदफैली असणार आहे. ह्या आणि अशा बऱ्याच कारणावरून सुद्धा, साखरपुडा झालेली बरीच लग्नं मोडलेली मी पाहिली आहेत.
३ ) सिनेमा आणि टीव्ही सिरीयलच्या माऱ्यामुळे, सगळी मुलं मुली अगदी दिवाने झालेले असतात. सिरीयल, सिनेमा मधील तेच भंपक फिल्मी जीवन ते स्वतः अनुभवू इच्छित असतात. फोनाफोनी, फिरणं, धरणं, ह्या गोष्टी सुरु होतात. आणि, हे काही जगापासून लपून राहत नाही. घरातल्यांना सांगून जरी ह्या भेटीगाठी होत असल्या. तरीही, लोकांच्या नजरा काही चांगल्या असतात का..? लग्न होईपर्यंत, हे दोघेही मनाने आणि तनाने स्वच्छ जरी असले. तरी लोकं, खायचं तेवढं शेन खातातच कि. आता काय कोरी राहिलीय का ती..? लग्नाआधी बरीच हजा मजा केली आहे तिने. असं म्हणून मोकळे होतात. यात, मुलाला कोणी दोष देत नाही. हे, प्रत्येक मुलीच्या माता पित्याने लक्षात घेतलं पाहिजे.
४ ) साखरपुड्या नंतर, फिरणं मौज मजा सुरु असते. परंतु,चुकून सुद्धा असं कोणाशीही आणि कधीही घडू नये. पण, दुर्दैवाने हा प्रकार माझ्या पाहण्यात आला आहे, म्हणून सांगतो. साखरपुडा झाल्यानंतर लग्नाला अवघे दोनचार महिने अवकाश असतो. तोवर मजा म्हणून, यांचं फिरणं धरणं चालू असतं. आणि, दुर्दैवाने त्या मुलाचा अपघाती किंवा कसाही अकस्मात मृत्यू झाला. तर, त्या नियोजित वधुवर फार मोठं आभाळ कोसळतं. तिला, त्या मुलाबरोबर फिरताना बरेच जणांनी पाहिलेलं असतं. त्यामुळे, आता तिचं कौमार्य भंग झालं आहे...! या आणि अशा इतर सुद्धा बऱ्याच अफवांना ऊत येतो. आणि, पर्यायाने त्या मुलीचं लग्न रखडतं. तिच्यावर दुहेरी संकटाचा घाला होतो. काहीवेळा, अशा कुमारिकांचं चक्क विधुर पुरुषांशी लग्नं लावण्यात आलेलं मी पाहिलं आहे.
आणि, हे सगळं... फक्त मुलींच्या बाबतीतच घडत असतं, मुलांच्या नाही. त्यामुळे सावधानता म्हणून, " झट मंगनी पट ब्याह " किंवा, विवाह समारंभात एकाच मांडवाखाली सगळे मंगल विधी उरकले जावेत. त्यामुळे, पुढे होणारे दुष्ट परिणाम टाळले जाऊ शकतील..

2 comments:

  1. याचकरीता मी लग्नाचा विचारही करत नाहीये. हाहाहा
    फार सुंदर विवाहीत होणाऱ्यांना ईशारा.

    ReplyDelete
  2. याचकरीता मी लग्नाचा विचारही करत नाहीये. हाहाहा
    फार सुंदर विवाहीत होणाऱ्यांना ईशारा.

    ReplyDelete