Thursday, 1 October 2015


घरात गणपती बसवायला, तुम्हाला कोणी जबरदस्ती केली आहे का..?
( भाग :- १ )
आमची फार जुनी परंपरा आहे, आई वडील सांगून गेलेत यात खंड पाडू नकोस, नाही राव करायला लागतय...!

बस्स्स... हि कारणं ऐकून अगदी वैताग आला आहे.
करायचं असेल, तर अगदी मनापासून करा. नाहीतर कशाला उगाच स्वतःला हि त्रास आणि त्या देवाला दुशनं..
परवा गणपती विसर्जन करायला गेलो. आणि, त्याठिकाणी काही विचित्र प्रकार मला पाहायला मिळाले.
एक व्यक्ती, हातामध्ये गणपती घेऊन नदीच्या पुलावर आला. आणि, वरूनच त्याने गणपतीची मूर्ती पाण्यामध्ये टाकून दिली. आणि, आल्या पावली तसाच माघारी फिरला.
एक जाडजूड व्यक्ती, पायामध्ये चपला घालून गणपती विसर्जन करण्यासाठी आला होता. मूर्तीच्या खाली लाकडी पाट सुद्धा नव्हता. मूर्तीच्या चौरंगाला धरून तसाच घेऊन निघाला होता. चुकून तो मातीचा चौरंग तुटला असता तर..?
एक जोडपं, लाकडी पाटावर गणपती घेऊन आले. त्यांनी, विसर्जनाच्या अगोदरची आरती वगैरे काही सुद्धा केली नाही. हौदामध्ये गणपती विसर्जन केला. आणि, तिथे जवळच असणाऱ्या एका भिंतीवर बसून गुलुगुलू गप्पात ते दोघेही रममाण झाले.
तर काही व्यक्तींनी, आपल्या घरातील गणपतीची मूर्ती मोठ्या गणेश मंडळांच्या मांडवात आणून ठेवल्या होत्या.
तुमचा गणपती जेंव्हा विसर्जनाला नेणार आहात. तेंव्हा, त्याच्यासोबत आमचाही गणपती तुम्हीच विसर्जन करून टाका..!
अरे... हे काय आहे राव..?
तसं पाहायला गेलं तर, गणपती आपल्याकडे पाहुणा म्हणून आलेला असतो. दहा दिवस आपण त्याची अगदी व्यवस्थितपणे सरबराई करतो.
मग, शेवटच्या दिवशी हि अनास्था का..?
आपल्या घरी कोणी पाहुणा आला. तर जाते वेळी, आपण त्याला सोडवायला बस स्टेन्ड, एसटी स्टेन्ड किवा रेल्वेस्थानका पर्यंत जात असतो.
अरे... तर मग, हा तर चक्क आपला देव आहे. त्याची विदाई, आपण किती हौसेने थाटामाटात आणि धुमधडाक्यात केली पाहिजे.
हि गोष्ट, खरं तर मी इथे लिहिणार नव्हतो. पण, हे वाचून तरी काही लोकामंध्ये जनजागृती निर्माण होईल. अशी, भोळी अशा बाळगून मी इथे व्यक्त झालो आहे.
क्रमशः 

No comments:

Post a Comment