आपला नवरा, किती फास्ट पळू शकतो पाहायचंय..?
फक्त जोरात ओरडा , फोन वाजतोय उचलु का..?
गेली, तीन चार दिवस झाले. हा विनोद मला बऱ्याच महिलांच्या भिंतीवर पाहायला मिळतोय.
परंतु, हा विनोद काही माझ्या पचनी पडत नाहीये...!
कारण...
अशी लफडी करणारे महाभाग, खूप चतुर प्राणी असतात. एकतर, यांच्या 'तिकडून' येणाऱ्या किंवा जाणाऱ्या फोनच्या वेळा पक्क्या ठरलेल्या असतात. शिवाय, त्यांचे 'असले' फोन नंबर मोबाईल मध्ये विशिष्ट अशा नावाने सेव असतात. त्यामुळे, ते लवकर कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही.
सगळ्यांच्या माहिती साठी.. उदा :- तुकाराम प्लंबर. घरगुती बाई, त्या प्लंबर शी बोलायला उत्सुक असणार आहे का..?
देखो..ये लगा सिक्सर. इथेच त्यांची गेम सक्सेस होऊन जाते.
कितीही टोकाचं संकट आलं तरी सुद्धा. ठराविक वेळेची मर्यादा पाळत. ते कधीच, एकमेकांना फोन करणार नाहीत. लागलं तर, दुसऱ्या दिवशी भेटून कालचा प्रसंग कथन करतील. एकेमेकाचा जीव घेतील. पण, आणीबाणीच्या काळात त्यांच्या कडून कधीच गफलत होणार नाही. एवढं सगळं पाळलं, तरच यांचे खरे खुरे संसार मार्गी लागतात. नाहीतर...
वानगीदाखल, एक उदाहरण पेश करतो...
माझा एक अतिशय देखणा मित्र होता. दिसायला देखणा असल्यामुळे, अर्थातच त्याची सुद्धा बाहेर बरीच 'प्रकरणं' होती. एक प्रकरण तर, अगदी त्याच्या घरापासून दोन चार घरं सोडूनच होतं. हा सुद्धा विवाहित, आणि ती सुद्धा. एक विश्वासू सहकारी म्हणून, त्याने माझी त्या महिलेशी ओळख सुद्धा करून दिली होती.
एकदा अचानक... वयाच्या चाळीशीतच माझ्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला. आणि, तो त्यातच गेला. ऐन तारुण्यात, त्याचा संसार उघड्यावर पडला होता. त्याची बायको, त्याच्या कलेवरावर धाय मोकलून रडत होती. बऱ्याच महिला तिची मनधरणी करत होत्या.
त्या गर्दीमध्ये, ती सुद्धा अगदी त्याच्या कलेवराच्या शेजारीच उभी होती. त्याचं, निस्तेज कलेवर पाहून, तिचं काळीज सुद्धा आतून तीळतीळ तुटत होतं. तिला सुद्धा, मनभरून मोकळं ढाकळ रडावसं वाटत होतं. त्याच्या निश्चल देहाला स्पर्श करावासा वाटत होता.
पण.. ते शक्य होतं का..?
नाही, शेवटपर्यंत तिला तिचं मन मारावच लागलं होतं. कारण, प्रेम करणारा तर केंव्हाच निघून गेला होता. आणि, तिझ्या समोर तिचा अक्खा संसार पडला होता.
लोकांच्या नजरेत, एक खरा शेजारधर्म म्हणून ती रडत होती. पण खरं पाहायला गेलं तर, ती तिचं खरं प्रेम व्यक्त करत होती. तोंडाला, साडीचा पदर लाऊन हमसू हमसून रडून मन मोकळं करत होती. मात्र त्यावेळी, तिला सावरायला एक सुद्धा हात पुढे येणार नव्हता. हे तिझं दुर्दैव होतं. तिच्यावर सुद्धा, संकटाचा फार मोठा घाला झाला होता. पण, तो 'अनधिकृत' होता..
हे मात्र, माझ्याशिवाय कोणाच्या लक्षात सुद्धा येऊ शकलं नाही.
फक्त जोरात ओरडा , फोन वाजतोय उचलु का..?
गेली, तीन चार दिवस झाले. हा विनोद मला बऱ्याच महिलांच्या भिंतीवर पाहायला मिळतोय.
परंतु, हा विनोद काही माझ्या पचनी पडत नाहीये...!
कारण...
अशी लफडी करणारे महाभाग, खूप चतुर प्राणी असतात. एकतर, यांच्या 'तिकडून' येणाऱ्या किंवा जाणाऱ्या फोनच्या वेळा पक्क्या ठरलेल्या असतात. शिवाय, त्यांचे 'असले' फोन नंबर मोबाईल मध्ये विशिष्ट अशा नावाने सेव असतात. त्यामुळे, ते लवकर कोणाच्या लक्षात सुद्धा येत नाही.
सगळ्यांच्या माहिती साठी.. उदा :- तुकाराम प्लंबर. घरगुती बाई, त्या प्लंबर शी बोलायला उत्सुक असणार आहे का..?
देखो..ये लगा सिक्सर. इथेच त्यांची गेम सक्सेस होऊन जाते.
कितीही टोकाचं संकट आलं तरी सुद्धा. ठराविक वेळेची मर्यादा पाळत. ते कधीच, एकमेकांना फोन करणार नाहीत. लागलं तर, दुसऱ्या दिवशी भेटून कालचा प्रसंग कथन करतील. एकेमेकाचा जीव घेतील. पण, आणीबाणीच्या काळात त्यांच्या कडून कधीच गफलत होणार नाही. एवढं सगळं पाळलं, तरच यांचे खरे खुरे संसार मार्गी लागतात. नाहीतर...
वानगीदाखल, एक उदाहरण पेश करतो...
माझा एक अतिशय देखणा मित्र होता. दिसायला देखणा असल्यामुळे, अर्थातच त्याची सुद्धा बाहेर बरीच 'प्रकरणं' होती. एक प्रकरण तर, अगदी त्याच्या घरापासून दोन चार घरं सोडूनच होतं. हा सुद्धा विवाहित, आणि ती सुद्धा. एक विश्वासू सहकारी म्हणून, त्याने माझी त्या महिलेशी ओळख सुद्धा करून दिली होती.
एकदा अचानक... वयाच्या चाळीशीतच माझ्या मित्राला हृदयविकाराचा झटका आला. आणि, तो त्यातच गेला. ऐन तारुण्यात, त्याचा संसार उघड्यावर पडला होता. त्याची बायको, त्याच्या कलेवरावर धाय मोकलून रडत होती. बऱ्याच महिला तिची मनधरणी करत होत्या.
त्या गर्दीमध्ये, ती सुद्धा अगदी त्याच्या कलेवराच्या शेजारीच उभी होती. त्याचं, निस्तेज कलेवर पाहून, तिचं काळीज सुद्धा आतून तीळतीळ तुटत होतं. तिला सुद्धा, मनभरून मोकळं ढाकळ रडावसं वाटत होतं. त्याच्या निश्चल देहाला स्पर्श करावासा वाटत होता.
पण.. ते शक्य होतं का..?
नाही, शेवटपर्यंत तिला तिचं मन मारावच लागलं होतं. कारण, प्रेम करणारा तर केंव्हाच निघून गेला होता. आणि, तिझ्या समोर तिचा अक्खा संसार पडला होता.
लोकांच्या नजरेत, एक खरा शेजारधर्म म्हणून ती रडत होती. पण खरं पाहायला गेलं तर, ती तिचं खरं प्रेम व्यक्त करत होती. तोंडाला, साडीचा पदर लाऊन हमसू हमसून रडून मन मोकळं करत होती. मात्र त्यावेळी, तिला सावरायला एक सुद्धा हात पुढे येणार नव्हता. हे तिझं दुर्दैव होतं. तिच्यावर सुद्धा, संकटाचा फार मोठा घाला झाला होता. पण, तो 'अनधिकृत' होता..
हे मात्र, माझ्याशिवाय कोणाच्या लक्षात सुद्धा येऊ शकलं नाही.
No comments:
Post a Comment