काही कामानिमित्त..
एकदा मी, मराठवाड्यातील जालना या गावी गेलो होतो. त्याठिकाणी, एका मिठाईच्या दुकानात भलतीच गर्दी उसळली होती. त्यामुळे, कुतूहल म्हणून मी सुद्धा त्या गर्दीमध्ये मिसळून गेलो. आणि, त्या गर्दीचा एक भाग झालो..
दुकानात... कढई मध्ये गरम-गरम भजी बनवण्याचं काम चालू होतं. त्याच्या बाजूलाच, एका परातीत जिलेबीचे गोल-गोल नारंगी वेटोळे पाक सोडत निपचित पहुडले होते. चोहीकडे, खमंग सुहास दरवळत होता.
भजी आणि जिलेबी... हे दोन्ही पदार्थ माझ्या अगदी जीवाभावाचे..
पण विषय असा झाला...
दोन्ही पदार्थांची एक-एक प्लेट घ्यावी. तर, ते मला एकट्याला सरणार नव्हतं.
त्यामुळे, मी भजीला प्राधान्य दिलं. आणि, मी त्याचा कुरकुरीत आस्वाद घेऊ लागलो.
तितक्यात एक व्यक्ती, त्या मिठाई वाल्याला म्हणाला..
" अरे भाई, एक 'टक्कर' दे दो..! "
हे नवीन नाव ऐकून, मी तर अगदी चक्रावून गेलो.
एकतर हे दोघेही, मनुष्य प्राणी आहेत. आता, नेमकी कोण कोणाला टक्कर देणार..?
हा, मला पडलेला प्रश्न..
पण, त्याचं उत्तर मला ताबडतोड मिळालं..
त्या मिठाई वाल्याने...
एका कागदा मध्ये, थोडे भजी आणि थोडी जिलेबी एकत्र करून त्या व्यक्तीच्या हातात दिले.
आणि.. अशारितीने, त्याने भजी आणि जिलेबीची संगम घडवून फर्मास टक्कर लाऊन दिली..
आहे कि नाही गंमत...!
मस्त पंडित भाऊ☺
ReplyDeleteधन्यवाद..
Deleteधन्यवाद..
Delete