आमच्या, पुणे महानगरपालिकेत..
" कुत्रा बंदोबस्त विभाग " नावाचं एक खातं आहे. या विभागात, प्रामुख्याने पिसाळलेल्या कुत्र्यांना जेरबंद करणं. आणि, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचं काम केलं जातं. कुत्र्यांची नसबंदी केली, कि त्यांना जेथून पकडून आणलं होतं. त्याच ठिकाणी पुन्हा सोडावं लागतं. असा नियम आहे. आणि, आमचे कर्मचारी ती भूमिका अगदी चोख बजावतात.
साधारण, पाच सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या कुत्रा बंदोबस्त विभागाच्या परिसरात, मी फेरफटका मारत होतो. तर, त्या विभागाच्या बाहेर एक ग्रामीण कुटुंब बसलेलं मला आढळलं. मला वाटलं, बहुतेक यांचं कुत्रं वगैरे पकडून आणलं असावं. त्यामुळे, कुत्रा सोडण्याच्या प्रतीक्षेत ते बसले असावेत. पण, मी परत फिरून आलो तरी सुद्धा ते त्याच जागेवरच होते. त्यामुळे, एक कुतूहल म्हणून मी त्यांना विचारलं.
काय हवंय तुम्हाला..?
तर म्हणाले.. आम्हाला कुत्रे पाहिजेत..!
तो माणूस, अनेकवचनी बोलला होता. त्यामुळे, मी त्याला पुन्हा विचारलं कुत्रा कि कुत्रे..? म्हणाला.. दोन चार कुत्रे मिळाले तर बरं होईल...!
त्या व्यक्तीच्या कपड्यावरून, त्याची परिस्थिती मला अगदी जेमतेमच वाटत होती. खरं तर, त्यालाच पोटभर खायाला मिळत नसेल. तर, तो ह्या कुत्र्यांना काय खायाला घालणार.?
हा, मला पडलेला प्रश्न.
शेवटी.. माझ्या मनातलं मी त्याला विचारलंच.. तर म्हणाला,
आमच्या जातीत.. ज्या माणसाकडं जास्ती कुत्री असत्यात. त्याला, शिरमंत समजत्यात. त्याच्या पोराला, लगीच पोरगी मिळतीय. जमीन जुमला काही इचारीत नाही. घरात, कुत्री किती हायीत ते इचारत्यात. माझ्यासाठी, हा अगदी नवखा प्रकार होता..
मी म्हणालो..आणि मग, त्या कुत्र्याचं काय करायचं..?
त्यानला.. शिकवून, सवरून शिकार करायला लावायची.. ससा, घोरपड, सायाळ पकडायला शिकवायचं. पोटापाण्याची सोय व्हती, पैका मिळतोय..
अरे ते सगळं खरं आहे, पण इतक्या कुत्र्यांना तुम्ही खायाला काय घालनार..?
तर म्हणाला.. आमच्या बाया, घरं मागायला जात्यात कि. त्या भाकरी, आम्ही कुत्र्याला घालतो. आम्ही नाय खात.. ( नाही म्हणता, काही लोकं ते शिळं पाकं अन्न खात सुद्धा असतील. )
हे ऐकून, मी तर अगदी थक्कच झालो. आपण समजतो. कि घरोघरी मागितलेलं अन्न ते स्वतः खात असतील. पण नाही, हे सगळं ते त्यांच्या कुत्र्यांसाठी करत असतात.
गप्पांमध्ये, माझा बराच वेळ निघून गेला होता. तोवर, आतील कर्मचाऱ्याने वर्षभराच्या वयाची तीन कुत्री त्याला आणून दिली. त्याने सुद्धा, खुश होऊन त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये एक पाचशेची नोट कोंबली. आणि काखेत कुत्री घेऊन, त्या कुटुंबाने तेथून काढता पाय घेतला.
" कुत्रा बंदोबस्त विभाग " नावाचं एक खातं आहे. या विभागात, प्रामुख्याने पिसाळलेल्या कुत्र्यांना जेरबंद करणं. आणि, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचं काम केलं जातं. कुत्र्यांची नसबंदी केली, कि त्यांना जेथून पकडून आणलं होतं. त्याच ठिकाणी पुन्हा सोडावं लागतं. असा नियम आहे. आणि, आमचे कर्मचारी ती भूमिका अगदी चोख बजावतात.
साधारण, पाच सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या कुत्रा बंदोबस्त विभागाच्या परिसरात, मी फेरफटका मारत होतो. तर, त्या विभागाच्या बाहेर एक ग्रामीण कुटुंब बसलेलं मला आढळलं. मला वाटलं, बहुतेक यांचं कुत्रं वगैरे पकडून आणलं असावं. त्यामुळे, कुत्रा सोडण्याच्या प्रतीक्षेत ते बसले असावेत. पण, मी परत फिरून आलो तरी सुद्धा ते त्याच जागेवरच होते. त्यामुळे, एक कुतूहल म्हणून मी त्यांना विचारलं.
काय हवंय तुम्हाला..?
तर म्हणाले.. आम्हाला कुत्रे पाहिजेत..!
तो माणूस, अनेकवचनी बोलला होता. त्यामुळे, मी त्याला पुन्हा विचारलं कुत्रा कि कुत्रे..? म्हणाला.. दोन चार कुत्रे मिळाले तर बरं होईल...!
त्या व्यक्तीच्या कपड्यावरून, त्याची परिस्थिती मला अगदी जेमतेमच वाटत होती. खरं तर, त्यालाच पोटभर खायाला मिळत नसेल. तर, तो ह्या कुत्र्यांना काय खायाला घालणार.?
हा, मला पडलेला प्रश्न.
शेवटी.. माझ्या मनातलं मी त्याला विचारलंच.. तर म्हणाला,
आमच्या जातीत.. ज्या माणसाकडं जास्ती कुत्री असत्यात. त्याला, शिरमंत समजत्यात. त्याच्या पोराला, लगीच पोरगी मिळतीय. जमीन जुमला काही इचारीत नाही. घरात, कुत्री किती हायीत ते इचारत्यात. माझ्यासाठी, हा अगदी नवखा प्रकार होता..
मी म्हणालो..आणि मग, त्या कुत्र्याचं काय करायचं..?
त्यानला.. शिकवून, सवरून शिकार करायला लावायची.. ससा, घोरपड, सायाळ पकडायला शिकवायचं. पोटापाण्याची सोय व्हती, पैका मिळतोय..
अरे ते सगळं खरं आहे, पण इतक्या कुत्र्यांना तुम्ही खायाला काय घालनार..?
तर म्हणाला.. आमच्या बाया, घरं मागायला जात्यात कि. त्या भाकरी, आम्ही कुत्र्याला घालतो. आम्ही नाय खात.. ( नाही म्हणता, काही लोकं ते शिळं पाकं अन्न खात सुद्धा असतील. )
हे ऐकून, मी तर अगदी थक्कच झालो. आपण समजतो. कि घरोघरी मागितलेलं अन्न ते स्वतः खात असतील. पण नाही, हे सगळं ते त्यांच्या कुत्र्यांसाठी करत असतात.
गप्पांमध्ये, माझा बराच वेळ निघून गेला होता. तोवर, आतील कर्मचाऱ्याने वर्षभराच्या वयाची तीन कुत्री त्याला आणून दिली. त्याने सुद्धा, खुश होऊन त्या कर्मचाऱ्याच्या हातामध्ये एक पाचशेची नोट कोंबली. आणि काखेत कुत्री घेऊन, त्या कुटुंबाने तेथून काढता पाय घेतला.
No comments:
Post a Comment