आम्हा सर्व मित्रांचा, घोड्यावरून एकत्रित प्रवास चालू होता.
रमत गमत बर्फाळलेल्या दर्याखोर्यातून प्रवास करताना खूप मजा वाटत होती. वाटेत, भारतीय सैनिकांची छावणी लागली. त्यांनी, यात्रेकरूंसाठी पिण्याकरिता गरम पाण्याची व्यवस्था केली होती. तिथे लावलेल्या देशभक्ती गीतांनी गर्वाने छाती फुलून आली. गरम पाणी पिऊन, घसा सुद्धा तृप्त झाला. भारतीय सैनिकांना, एक मोठ्ठा "जयहिंद" ठोकून, आम्ही पुढे मार्गक्रमण केलं.
आता पुढील लक्ष होतं. "मह्नुगस" टॉप यालाच "गणेश" टॉप असं सुद्धा म्हणतात. हि चढाई सुद्धा, खूप खडतर अशी होती. परंतु, जो काही त्रास होणार होता. तो, घोड्याला आणि घोडेमालकाला. आम्ही, निवांत बसून प्रवास करणार होतो. मह्नुगस टॉप, समुद्रसपाटीपासून सुमारे १४८०० फुट उंच आहे. अगदी, विरळ अशी हवा. आणि, ऑक्सिजनची अत्यंत कमतरता असलेलं हे ठिकाण. या शिखराहून, अनेक हिमनद्या उगम पावतात. त्यामुळे, अर्थातच हवामान अत्यंत थंड असतं.
आता पुढील लक्ष होतं. "मह्नुगस" टॉप यालाच "गणेश" टॉप असं सुद्धा म्हणतात. हि चढाई सुद्धा, खूप खडतर अशी होती. परंतु, जो काही त्रास होणार होता. तो, घोड्याला आणि घोडेमालकाला. आम्ही, निवांत बसून प्रवास करणार होतो. मह्नुगस टॉप, समुद्रसपाटीपासून सुमारे १४८०० फुट उंच आहे. अगदी, विरळ अशी हवा. आणि, ऑक्सिजनची अत्यंत कमतरता असलेलं हे ठिकाण. या शिखराहून, अनेक हिमनद्या उगम पावतात. त्यामुळे, अर्थातच हवामान अत्यंत थंड असतं.
प्रवासादरम्यान, मी, थोडं घोडेमालकाशी हितगुज केलं. त्यावर समजलेली माहिती अशी. वर्षातले दोन महिने, त्यांचा घोडे चालवणे हा प्रमुख व्यवसाय असतो. ह्या दोन महिन्यात, सगळा खर्च वजा जाता चाळीस ते पन्नास हजार रुपये यांच्याकडे शिल्लक राहतात. त्यांच्या, कष्टाच्या मानाने हि रक्कम अगदीच अत्यल्प आहे. चंदनवाडी ते पवित्र गुफा आणि, पुन्हा चंदनवाडी. अशा प्रवासाचे सरकारी नियमानुसार ६५००/- रुपये इतकं एका घोड्याचं भाडं आहे. परंतु, एवढी रक्कम त्यांना कोणीच देत नाही. जास्तीत जास्त २२००/- ते २५००/- रुपयांमध्ये हा सौदा पार पडतो. दोन दिवसामध्ये' येऊन जाऊन सत्तर किलोमिटरचं अंतर एका व्यक्तिला पार करावं लागतं. साहजिकच, चालून चालून त्यांची पोटं अगदी खपाटीला गेली आहेत. आणि, गालफाड आत मध्ये. त्यांच्या मेहनतीला सीमाच नव्हती. हि लोकं, अगदी किरकोळ देहयष्टीचे परंतु काटक असतात. हा व्यवसाय करणारा तीस पस्तीस वयाचा व्यक्ती सुद्धा, पन्नाशीतील वाटत होता. त्यांना, मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईमध्ये ते असमाधानी वाटत होते. चर्चा करत असताना, घोडेमालकाचं एक वाक्य, मनाला खूप चटका लाऊन गेलं.
"क्या करे साहब, बिलकुल नही परवडता. लेकीन करणा पडता है." एक सवारीमे, हजार रुपये तो घोडेके खानेमे चले जाते है. लगबग पांचसौ तक हमारा खर्चा होता है. बाकी, क्या बचता है ?
साहब.. डीझल, पेट्रोल कुछ नही लगता...!
खाली, "खून जलता है खून".
त्याची प्रतिक्रिया, खूपच बोलकी होती. परंतु.. त्याला, माझा सुद्धा नाईलाज होता.
"क्या करे साहब, बिलकुल नही परवडता. लेकीन करणा पडता है." एक सवारीमे, हजार रुपये तो घोडेके खानेमे चले जाते है. लगबग पांचसौ तक हमारा खर्चा होता है. बाकी, क्या बचता है ?
साहब.. डीझल, पेट्रोल कुछ नही लगता...!
खाली, "खून जलता है खून".
त्याची प्रतिक्रिया, खूपच बोलकी होती. परंतु.. त्याला, माझा सुद्धा नाईलाज होता.
बोलता-बोलता, बरच अंतर कापलं गेलं होतं. आणि, पुन्हा एकदा नवीन शिवधून कानी पडली. समोर एक, मोठा लंगर नजरेस पडला. 'पोषपत्री' असं त्या लंगरचं नाव. दिल्लीमधील व्यावसाईक लोकं हा लंगर चालवतात. संपूर्ण प्रवासातील हा एक नंबरचा लंगर. पंचतारांकित हॉटेल मध्ये जे पदार्थ मिळणार नाहीत. ते पदार्थ सुद्धा, या ठिकाणी उपलब्ध होते. या ठिकाणी, अर्ध्या तासाची विश्रांती असते. यात्रेकरू, थोडीफार पोटपूजा करतात. घोडा आणि घोडे मालक, थोडी विश्रांती करतात. याठिकाणी, घोड्याला चारापाणी दिलं जातं. दुपारचे, चार वाजले होते. आता, पुढील प्रवासाला सुरवात करायची होती. मी घोड्यावर स्वार झालो. वाटेत एक झरा लागला. घोडा आणि घोडेमालक, दोघेही त्या वाहणाऱ्या झऱ्यात तोंड घालून एकत्र पाणी पीत होते.
थोडंसं ताजंतवानं झाल्यावर, आम्ही पुढील प्रवासाला सुरवात केली. आमच्या आजच्या प्रवासातील, आता, शेवटचा टप्पा राहिला होता. "पंचतरणी"... शेषनाग ते पंचतरणी, हे एकूण तेरा किलोमिटरचं अंतर. भैरव पर्वताच्या सानिध्यातील, समुद्रसपाटीपासून ११५०० फुट उंच असलेलं हे ठिकाण. यात्रेकरूंच्या मुक्कामाचं असलेलं हे ठिकाण आहे.
प्रवासाला सुरवात झाली. लंगर मधून आणलेले दोन तीन गोड पदार्थ मी घोडेमालकाला दिले. त्याने ते, खुशीने आपल्या खिशामध्ये ठेवले. घरी गेल्यावर खातो म्हणाला. दूर डोंगरावर, काही मेंढ्या चरत होत्या. आणि, शेजारीच काही राहुट्या सुद्धा होत्या. त्याकडे, हात करत तो म्हणाला. त्या मेंढ्या' आणि, ती राहुटी आमची आहे. यात्रे दरम्यान, दोन महिने आमचं वास्तव्य या खोऱ्यात असतं. अवती भवतीचा, सुंदर नजारा पाहत, घोड्यावर झुलत माझा प्रवास चालू होता. इथून पुढचा प्रवास म्हणावा इतका कठीण नव्हता. दुरूनच' वाहणारी नदी, हिमपर्वत आणि' बऱ्याच रंगीबिरंगी तंबूंची गर्दी दिसली. आजच्या प्रवासातील शेवटचा टप्पा जवळ आला होता. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत, आम्ही पंचतरणी मध्ये पोहोचलो. घोडेमालकाला ठरलेल्या रकमेपेक्षा, मी' शंभर रुपये आगाऊ दिले. गडी भलताच खुश झाला. आणि, मला सुद्धा खूप समाधान वाटलं. मी 'शेरा' नामक घोड्याच्या पाठीवर, एक प्रेमळ थाप मारली. इथपर्यंत सुखरूप पोहोचवल्या बद्धल दोघांचे आभार मानले.
आणि, मी तेथून चालता झालो.
क्रमशः
आणि, मी तेथून चालता झालो.
क्रमशः
No comments:
Post a Comment