Sunday, 22 November 2015

किती फिरतोस रे बाबा..

ह्या विषयवार, दीड वर्षात बरेच विनोद निर्माण झाले. काल परवा, ब्रिटन वारीवर असताना तर. त्या विनोदांनी अगदी कहरच केला. लोकशाही मध्ये हे सगळं चालायचंच. त्याचं कोणी वाईट मानून घेऊ नये.

पण, एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटतेय...!

स्वतःवरून उदाहरण घ्या, आपण काय रोज उठून फिरायला जात नाही. वर्षातून एकदा किंवा खूप झालं तर दोनदा. याच्या पलीकडे काय आहे नाही का.. 
पण, आपण ती नियोजित सहल करत असताना तिसऱ्या, चौथ्या दिवशीच आपल्याला घराची आठवण येते. घराबाहेर कितीही सुखसोयी असुध्यात, पण आपल्याला घरचेच वेद लागतात. ते का..? 
कारण, घराबाहेर कितीही उंची सुविधा असल्या. तरी, आपल्याला आपलं घरच चांगलं वाटत असतं. शेवटी, आपलं ते आपलंच असतं..

आपण, तरणे ताटे असताना फिरण्याच्या बहाण्याने का होईना वर्षातून दोनदा हफ्ताभर घराच्या बाहेर राहू शकत नाही.. तर, या वयात हा व्यक्ती इतके देश फिरण्याची धावपळ कशासाठी करत असावा..?

फुकटात देश विदेश फिरायला मिळतोय म्हणून...? 

नाही... त्यापाठीमागे, नक्कीच काही तरी ठोस कारणं असतील. असं, मला तरी मनापासून वाटतंय. आणि, येत्या काळात आपल्याला ते पाहायला सुद्धा मिळेल..
जास्ती काही चर्चा करत बसत नाही..

आलिया भोगाशी असावे सादर.. असं म्हणा, आणि विषयाला पूर्णविराम द्या.

No comments:

Post a Comment