Wednesday, 4 November 2015

एक सामाजिक भान म्हणून...
मला नेहेमीच, लग्न समारंभात जावच लागतं. त्यावेळी, मला आमच्या किंवा इतर समाजातील तरुण मुलं हौसेने भेटत असतात. मला भेटणाऱ्या त्या मुलांमध्ये, एखादा अविवाहित तरुण जर माझ्यासमोर आला. तर, नकळतपणे माझ्या तोंडून सुद्धा हे वाक्य निघतच..
" काय रे... तुझे लाडू कधी खाऊ घालातोयेस मला..? "

त्यावर, लाजून... एकतर तो अविवाहित मुलगा निरुत्तर तरी होतो. किंवा, त्या विषयाला तो हसण्यावारी तरी घेऊन जातो.
हे झालं, मुलांच्या बाबतीत. आम्ही, पुरुष मंडळी तरी काही गोष्टी फार गमतीने आणि हलक्याच घेतो.

परंतु, हाच प्रश्न.. 
लग्न समारंभात, एखाद्या अविवाहित मुलीला. एका, स्त्रीकडून विचारण्यात आला तर..?

" काय गं, तुझं अजून ठरतंय कि नाही...?
तेंव्हा.. त्या, अविवाहित मुलींवर काय संकट कोसळत असेल..? 
याची, तुम्ही फक्त कल्पना करा..

" स्त्रीने, स्त्रीवर केलेला शाब्दिक 'प्रहार' खूपच वर्मी असतो.. "

No comments:

Post a Comment