Monday, 2 November 2015

हे धर्मादाय संस्थेतील लोक, गरिबांना अन्न वाटतात... खरच, हे खूप चांगलं काम आहे...!
पण त्यामुळे, ती लोकं ऐतखाऊ होतात त्याचं काय..?
एकदा अशाच एका संस्थेतील लोकांना, मी ह्या विषयावरून हटकलं होतं.
तर म्हणाले... तुम्हारा क्या जाता है.. ?
मी त्यांना म्हणालो..
हमारा, कुछ भी नही जाता है. लेकीन, तुम्हारे घरका कुछ जाता है क्या..?
इथून तिथून, फंड जमा करता. आणि, यांना पोसता...!
हि लोकं तुमची कोण लागतायेत..?
तर म्हणाले, आम्ही समाजसेवा करतोय..!
आता, मला माहित आहे. हे लोकं नेमिकी समाजसेवा करतायत, कि समाज भरकटवत आहेत..?
हे मी सांगायला नकोय. या फुकट खाऊ लोकांना एकच धंदा आहे. काहीही कामधंदा न करता फुकटचं खायचं, आणि रात्रंदिवस फुटपाथवर पडून राहायचं.
अशाने, आपली मोठी शहरं " स्मार्ट सिटी " होणार आहेत का..?
मध्यंतरी, पुण्यातील एक मोठे व्यावसायिक अशा गरजू लोकांना. मोफत.. दुधाच्या पिशव्या, तांदळाच्या पिशव्या वाटायचे. तर हि नालायक लोकं, त्या पिशव्या अल्प दरात कोणाला तरी विकायचे. आणि, त्यापासून मिळणाऱ्या पैश्यातून व्यसनं करायचे. काही काळानंतर, हा प्रकार त्या व्यावसायिकाच्या ध्यानात आल्यानंतर. त्याने, ताबडतोब हा प्रकार बंद करून टाकला.
आणि, पुण्यातच कोठेतरी अन्नछत्र उघडलं. ज्याच्या पोटात खरोखर आग पडली असेल. तो येईल, आणि अन्न ग्रहण करून जाईल. हा त्यामागचा प्रामाणिक उद्देश.
निस्वार्थ सेवा करा हो.
हे नालायक ऐतखाऊ लोकं. यांचे फुकटचे तुकडे तोडतात. आणि दिवसभर.. गांजा, दारू आणि नशा म्हणून नवीन आलेलं ते व्हाईटनर ओढत बसतात.
गरिबांना अजून गरीब आणि लाचार करायचं. आणि, आपल्या देशाला आणखीन पाठीमागे न्यायचे हे धंदे आहेत.
असं, माझं ठाम आणि परखड मत आहे...! 

No comments:

Post a Comment