मध्यंतरी टीव्हीवर,
डिस्कवरी चेनल पाहत होतो. त्यावेळी, नेमका अकबर बादशहाचा विषय चालू होता. त्याने बांधलेल्या, फतेहपुर सिक्री ह्या किल्ल्याची माहिती सांगत आणि दाखवत होते. कसला जबरदस्त किल्ला, आणि काय त्याची अफलातून माहिती...व्वा,
हि माहिती देत असताना, तो निवेदक म्हणाला...
अकबर बादशाहाच्या.. एकूण, तीनशे पट्टराण्या होत्या. आणि वर, पाच हजार लग्नाच्या बायका सुद्धा होत्या. शिवाय, ह्या प्रत्येकी बरोबर त्यांच्या सेवेसाठी एक दासी नेमलेली होती. त्याउपर, यांच्यावर देखरेख करण्याकरिता. काही किन्नर ( छक्के ) लोकं सुद्धा नियुक्त केले गेले होते..
आता... डिस्कवरी चानल वाल्यांनी हि माहिती पुरवली आहे. म्हणजे, त्यात खोट तर नक्कीच नसणार आहे..
दहा बारा दिवस झाले, मी विचार करतोय...!
" त्या अकबर बादशाहने, येवढ्या साऱ्या पत्न्यांना कसं काय हेंडल केलं असेल...? "
खरं सांगायचं म्हणजे, हल्लीच्या प्रगत जमान्यात सुद्धा एक बायको सांभाळता-सांभाळता अगदी नाकीनऊ होतंय.
तर मग, त्या पुराणकाळात...!
मानलं पाहिजे राव, त्या राजे लोकांच्या धाडसाला...!
राजेच ते ...त्यांच काय काढावं 😉😉
ReplyDeleteभाऊ, हाहाहाहाहा... ;) (Y)
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete