कॉलेजमध्ये असताना...
आमच्या वर्गात, एक खूपच सुंदर मुलगी होती. माझे बरेच मित्र तिच्या पाठीमागे लागले होते. अनायसे, त्यात मी सुद्धा आलोच. पण, ती मुलगी काय कोणाला भिक घालतच नव्हती. आणि कोणी मुलगा, तिला भिडायचं धाडस सुद्धा करत नव्हता..
कारण.. ती चुकून नाही म्हणाली. तर, अपमान कोण सहन करणार..
दिवसामागून दिवस जात होते...
कारण.. ती चुकून नाही म्हणाली. तर, अपमान कोण सहन करणार..
दिवसामागून दिवस जात होते...
एके दिवशी, ती मुलगी एका मुलाच्या बाईकवर बसून कॉलेजमध्ये आली. आणि नेमके, आम्हीच त्याला साक्षीदार ठरलो.
सगळ्यांच्या मनामध्ये चलबिचल सुरु झाली.
कोणी म्हणतंय, अरे तिचा भाऊ असेल.. तर कोणी म्हणतंय, तिच्या ओळखीतला असेल. तर कोणी काय. तर कोणी काय...नुसतीच बिनकामाची चर्चा चालू होती.
सगळ्यांच्या मनामध्ये चलबिचल सुरु झाली.
कोणी म्हणतंय, अरे तिचा भाऊ असेल.. तर कोणी म्हणतंय, तिच्या ओळखीतला असेल. तर कोणी काय. तर कोणी काय...नुसतीच बिनकामाची चर्चा चालू होती.
बराच वेळ, ते दोघे तिथेच बोलत उभे होते. त्यावरून, मला थोडा अंदाज आला होता.
नंतर-नंतर मात्र हे नित्याचंच झालं..
नंतर-नंतर मात्र हे नित्याचंच झालं..
शेवटी, एके दिवशी... मी आणि आमचा चमू थेट त्या मुलालाच जाऊन भिडलो. त्याने सुद्धा, त्याच्या प्रेमाची प्रांजळ कबुली दिली. आणि म्हणाला,
आमचं लग्न ठरलं आहे...
ओठावर वरवरचं उसनं हसू आणून, आम्ही त्याचं अभिनंदन केलं. पण आम्ही, मनातून मात्र खूप जळफटत होतो.
शेवटी आम्ही, त्या मुलाला त्याचं नाव विचारलं.
शेवटी आम्ही, त्या मुलाला त्याचं नाव विचारलं.
त्याचं नाव, 'दिलीप' होतं..
काही नाहीतर, किमान लाडिक त्रासच द्यायचा... ह्या उद्देशाने. आम्ही मुलं, ती मुलगी आमच्या समोर आल्यावर हे गाणं म्हणत असू..
जा मुली जा... 'दिल्या' घरी तू सुखी राहा.
No comments:
Post a Comment