आमच्या गावातील, ( कराड मध्ये ) सर्रास लोकं. आपापल्या घरासमोरील संडास बाथरूमला. रात्रीच्या वेळी कुलूप लावत असतात..
आता तुम्ही सांगा, संडास म्हणजे काही कुलूप लावायची जागा आहे का..?
आता तुम्ही सांगा, संडास म्हणजे काही कुलूप लावायची जागा आहे का..?
पण.. नाही म्हणता, काही नालायक लोकांना घाबरून, त्यांना हे भीषण कृत्य करावंच लागतं.
कारण, काही लोकांचे विचार अगदी नीच पातळीचे हो..
स्वतः घरासमोर संडास बांधायचं नाही. पण, रातच्याला लोकांच्या संडासात जाऊन गपगुमान घाण करून यायची.
कारण, काही लोकांचे विचार अगदी नीच पातळीचे हो..
स्वतः घरासमोर संडास बांधायचं नाही. पण, रातच्याला लोकांच्या संडासात जाऊन गपगुमान घाण करून यायची.
कधी पुढारणार हो आपला देश..?
आपलं सरकार, रोजच्या रोज नवनव्या योजना काढतंय. गुड मॉर्निंग पथक सुद्धा काढून झालं, एवढं करून सुद्धा.. गुपचूप, सकाळच्या पारी, माळरानात लपूनछपून प्रातर्विधी करताना, त्या गुड मॉर्निंग पथकाच्या हाती लागून सुद्धा, हे छुपं कृत्य करत असतात. आणि असं करत असताना, घाबरून काही लोकं आपला जीव सुद्धा गमावून बसली आहेत.
जेजुरीच्या आसपासच्या गावात, माळरानात शौचाला बसलेला एक व्यक्ती, दंड भरावा लागेल म्हणून, गुड मॉर्निंग पथकाला घाबरून पळत सुटला होता. आणि त्या पळापळीतच, अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. आणि तो व्यक्ती जागेवरच खलास झाला. सांगा ना केवढ्यात पडलं हे. विनाकारण जीव गेला कि नाही. आणि बदनामी वेगळी, गावात शेवटपर्यंत हसायचा विषय झाला. काय तर, गडी हागता-हागता मेला..!
जेजुरीच्या आसपासच्या गावात, माळरानात शौचाला बसलेला एक व्यक्ती, दंड भरावा लागेल म्हणून, गुड मॉर्निंग पथकाला घाबरून पळत सुटला होता. आणि त्या पळापळीतच, अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. आणि तो व्यक्ती जागेवरच खलास झाला. सांगा ना केवढ्यात पडलं हे. विनाकारण जीव गेला कि नाही. आणि बदनामी वेगळी, गावात शेवटपर्यंत हसायचा विषय झाला. काय तर, गडी हागता-हागता मेला..!
वेळप्रसंगी.. सरकार अनुदान सुद्धा देतंय. पण त्याचा वापर कोण करणार..?
आणि तरीही..एवढं सगळं घडून सुद्धा काही लोकांना अक्कल येत नाही. काही पुरुष, रात्री अपरात्री.. स्वतः असा नको तो फाजीलपणा करत असतात. त्यामुळे अशी कुलपं लावावी लागतात. हे झालं पुरुषांचं,
आणि तरीही..एवढं सगळं घडून सुद्धा काही लोकांना अक्कल येत नाही. काही पुरुष, रात्री अपरात्री.. स्वतः असा नको तो फाजीलपणा करत असतात. त्यामुळे अशी कुलपं लावावी लागतात. हे झालं पुरुषांचं,
पण.. महिलांनी काय करायचं..?
" टॉयलेट " सिनेमात.. अक्षय कुमारने सुद्धा सांगून झालंय. आणि, आता मी सुद्धा सांगतो.
नको त्या, मोठमोठ्या गप्पा करण्यापेक्षा.. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये शौचालय बांधायलाच पाहिजे. तुम्हाला लाज नाही, पण किमान बायकांना तरी आहे. काही नाही, तर.. हे तरी ध्यानात घ्या राव.
या विषयावर, एका खेड्यात मी एकदा फार मोठा विनोदी स्लोगन वाचला होता. तो खास तुमच्यासाठी मी पेश करत आहे.
नको त्या, मोठमोठ्या गप्पा करण्यापेक्षा.. ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये शौचालय बांधायलाच पाहिजे. तुम्हाला लाज नाही, पण किमान बायकांना तरी आहे. काही नाही, तर.. हे तरी ध्यानात घ्या राव.
या विषयावर, एका खेड्यात मी एकदा फार मोठा विनोदी स्लोगन वाचला होता. तो खास तुमच्यासाठी मी पेश करत आहे.
आरं मर्दा, उगाच कशाला पिळतोस मिशा. तुझी बायको रस्त्यावर काढतेय..
" उठाबशा "
लगेच शाहने व्हा, आणि गाव खेड्यात राहणाऱ्या आणि शहरातील सुद्धा काही व्यक्तींनी. आपापल्या घराच्या बाहेर, शौचालय बांधून घ्या. कोणी नाही, तर.. किमान तुमच्या घरातील " आयाबायांचा " तरी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद लागेल.
No comments:
Post a Comment