गतवर्षी आजच्या दिवशी, बारावीच्या परीक्षेचा निकाल होता. त्यावेळी एक फार मोठी गंमत घडली.
माझ्या मित्राचा मेहुणा सुद्धा गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेला बसला होता. सहजच म्हणून, तो पास झालाय की नापास झाला आहे. हे पाहण्यासाठी त्याने आमच्या एका मित्राला नेटवर त्याचा निकाल पाहायला सांगितलं.
त्या मित्राने, मोबाईल नेटवर तो परीक्षा क्रमांक टंकला. आणि ताबडतोब निकला आमचा समोर आला.
माझ्या मित्राचा मेहुणा तब्बल चार विषयात नापास झाला होता..!
हे पाहून निकाल पाहणारा मित्र त्याला म्हणाला..
भाऊ, तुमच्या मेहुण्याला काही कळवू नका बरं का. तो चार विषयात नापास झाला आहे. टेन्शनमध्ये विनाकारण तो काहीतरी बरं वाईट करून घ्यायचा..!
भाऊ, तुमच्या मेहुण्याला काही कळवू नका बरं का. तो चार विषयात नापास झाला आहे. टेन्शनमध्ये विनाकारण तो काहीतरी बरं वाईट करून घ्यायचा..!
मित्राचे हे बोल ऐकून, माझा मित्र जोरजोरात हसायला लागला. नेमका काय प्रकार घडला आहे. ते आम्हाला समजेना.
शेवटी त्याचं हसू पूर्ण झाल्यावर तो आम्हाला म्हणाला..
शेवटी त्याचं हसू पूर्ण झाल्यावर तो आम्हाला म्हणाला..
अरे.. माझा मेहुणा मिलीटरी मध्ये कामाला आहे. आणि, यावर्षी तो रिटायर्ड सुद्धा होणार आहे.
एक टाईमपास म्हणून त्याने ही बारावीची परीक्षा दिली होती..!
😀
😀
😀
हा फक्त, एका परीक्षेचा निकाल आहे. याला, तुमच्या आयुष्याचा निकाल समजू नका.!
बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा.
☺
👍
बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा.
No comments:
Post a Comment