पैसे मिळवण्याकरिता काही लोकं इतकी लाचारी पत्करतात. कि त्या गोष्टीला अगदी मर्यादाच उरत नाही. पण जीवनात, काही गोष्टींचं तारतम्य हे नक्कीच बाळगायलाच हवं.
आमचं लग्न झाल्यावर, आम्ही दोघांनी एक धाडसी निर्णय घेतला. कि, आपल्याला जे काही पहिलं अपत्य होईल. आपण त्यावरच समाधान मानूयात. आपल्याला दुसरं मुल नकोच.
एवढंच काय, माझा मुलगा जसा कळता झाला. त्यावेळी, त्याला सुद्धा आम्ही तुला बहिण भाऊ हवा आहे का..? अशी विचारणा केली होती. त्यावेळी त्याने सुद्धा, आम्हाला नको म्हणून सांगितलं होतं. कारण, माझ्या बंधूंच्या मुली आणि मुलं यांनाच तो आपले सक्खे बहिण भाऊ मानतो.
त्यामुळे, या भाऊ बहिण विषयात त्याला म्हणावा असा रस नव्हता.
एवढंच काय, माझा मुलगा जसा कळता झाला. त्यावेळी, त्याला सुद्धा आम्ही तुला बहिण भाऊ हवा आहे का..? अशी विचारणा केली होती. त्यावेळी त्याने सुद्धा, आम्हाला नको म्हणून सांगितलं होतं. कारण, माझ्या बंधूंच्या मुली आणि मुलं यांनाच तो आपले सक्खे बहिण भाऊ मानतो.
त्यामुळे, या भाऊ बहिण विषयात त्याला म्हणावा असा रस नव्हता.
ठरल्याप्रमाणे, आम्ही आमच्या इच्छेची अमलबजावणी सुद्धा केली. त्यावेळी, आमचा मुलगा लहान असल्याने, संततिनियमनाची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी आम्हाला करू दिली नाही.
ते म्हणाले.. नंतर सावकाशपणे करा, आत्ताच घाई करण्याची काहीएक आवश्यकता नाहीये.
ते म्हणाले.. नंतर सावकाशपणे करा, आत्ताच घाई करण्याची काहीएक आवश्यकता नाहीये.
त्यानंतर, आम्ही सुद्धा ती गोष्ट विसरून गेलो. पण, आम्ही आमच्या निर्णयावर अगदी ठाम होतो. आणि.. साधारण चार पाच वर्षांपूर्वी, पुणे पालिकेतील एक व्यक्ती मला भेटली.
आणि सहज म्हणून, विचारपूस करताना तो व्यक्ती मला म्हणाला.
आणि सहज म्हणून, विचारपूस करताना तो व्यक्ती मला म्हणाला.
तुम्हाला किती मुलं आहेत..?
त्यावर मी त्यांना उत्तर दिलं, कि आम्हाला एकच मुलगा आहे.
तर ते म्हणाले.. तुम्ही किंवा तुमच्या मिसेसने संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे का..?
तर मी त्यांना नाही असं उत्तर दिलं.
त्यावर ते मला म्हणाले.. अहो तुम्ही हि शस्त्रक्रिया करून घेतली नसेल. तर ताबडतोब करून घ्या. कारण.. महाराष्ट्र सरकारने असा एक अध्यादेश काढला आहे. कि ज्या सरकारी कर्मचारी व्यक्तींनी एका अपत्यावर संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला, दोन जादा वेतनवाढी देण्यात येणार आहे.
त्यावर मी त्यांना उत्तर दिलं, कि आम्हाला एकच मुलगा आहे.
तर ते म्हणाले.. तुम्ही किंवा तुमच्या मिसेसने संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे का..?
तर मी त्यांना नाही असं उत्तर दिलं.
त्यावर ते मला म्हणाले.. अहो तुम्ही हि शस्त्रक्रिया करून घेतली नसेल. तर ताबडतोब करून घ्या. कारण.. महाराष्ट्र सरकारने असा एक अध्यादेश काढला आहे. कि ज्या सरकारी कर्मचारी व्यक्तींनी एका अपत्यावर संततिनियमनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला, दोन जादा वेतनवाढी देण्यात येणार आहे.
नाही म्हणता, माझ्यासाठी हि आनंदाची बातमी होती. कारण या ना त्या कारणाने, आम्ही त्या लाभार्थींच्या यादीमध्ये बसत होतो. त्यानंतर, आम्ही उभयतांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. आणि माझ्या सौने, स्वतः हि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
सगळे सोपस्कार पार पडले, आम्हाला थोडासा त्रास झाला, पणऑपरेशन सक्सेस झालं.
त्यानंतर.. या जादा वेतन वाढीच्या प्रोसिजरसाठी जी काही लागत होती, ती सगळी कागदपत्रे जमा करून, मी त्या कामाच्या मागे लागलो. जवळपास सगळी कामं मार्गी लागली होती. या कामासाठी धावपळ करताना, माझा तब्बल एक महिना गेला होता.
शेवटी.. सगळी आणि इत्यंभूत कागदपत्रे असणारी परिपूर्ण अशी फाईल. मी आमच्या आरोग्य विभागात सबमिट करण्यासाठी गेलो. तर, त्या विभागातील कारकून मला म्हणाले.
त्यानंतर.. या जादा वेतन वाढीच्या प्रोसिजरसाठी जी काही लागत होती, ती सगळी कागदपत्रे जमा करून, मी त्या कामाच्या मागे लागलो. जवळपास सगळी कामं मार्गी लागली होती. या कामासाठी धावपळ करताना, माझा तब्बल एक महिना गेला होता.
शेवटी.. सगळी आणि इत्यंभूत कागदपत्रे असणारी परिपूर्ण अशी फाईल. मी आमच्या आरोग्य विभागात सबमिट करण्यासाठी गेलो. तर, त्या विभागातील कारकून मला म्हणाले.
अहो.. या विषयावर तर सरकारने हल्लीच स्थगिती आणली आहे..!
हे तुम्हाला माहित नाही का..?
हे तुम्हाला माहित नाही का..?
एखादा सरकारी अध्यादेश निघाल्यावर, शक्यतो त्यावर कधीही स्थगिती येत नसते. तर मग, या प्रकरणात नेमकं काय घडलं असेल..? या गोष्टीने मी फार व्यथित झालो होतो. नाही म्हणता, आकाश पाताळ एक करत, याचा मला शोध घ्यावाच लागला. आणि, जेंव्हा या मुद्द्याला मी हात घातला. त्यावेळी, माझ्यासमोर एक फार मोठं भीषण वास्तव सामोरं आलं. कि ज्याची, आपण कधी कल्पना सुद्धा करू शकत नाही.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी,
काही सरकारी कर्मचारी असणाऱ्या स्त्री पुरुषांनी फार वेगवेगळ्या आणि चुकीच्या पद्धतीचा मार्ग अवलंबला होता. जे ऐकून, तुम्हाला सुद्धा त्या लोकांची कीव करावीशी वाटेल.
स्वतःची लायकी नसताना, मोठाले पगार घेणारे लोकं. अशा नीच पातळीवर उतरतातच कसे..?
तर.. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी..
काही महिलांना एका अपत्या नंतर, गर्भाच्या पिशवीचा त्रास जाणवू लागला होता. अशा महिलांनी, डॉक्टरी उपचाराने गर्भाची पिशवी काढून टाकली होती. ज्यामुळे, त्यांना इथून पुढे अपत्य होणारच नव्हतं. गर्भाची पिशवी काढली नसती. तर त्यांनी, दुसऱ्या अपत्यासाठी नक्कीच प्रयत्न केले असते. परंतु अशा स्त्रियांनी सुद्धा, संततिनियमन केल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर करून या योजनेचा लाभ मिळवला होता.
तर काही पुरुषांनी, त्यांना दोन अपत्य असताना. संततिनियमन करून घेतलं होतं. पण दुर्दैवाने, त्यातील त्यांचं एक अपत्य अकाली मृत्यू पावलं. अशा लोकांनी सुद्धा, खोटी माहिती देऊन, या योजनेचा लाभ उचलला होता. खरं पाहायला गेलं तर, शासनाची फसवणूक करणं हा फार मोठा गुन्हा आहे. पण पैश्याच्या मोहापायी काही लोकांनी हि नालायक कामं सुद्धा केली.
काही सरकारी कर्मचारी असणाऱ्या स्त्री पुरुषांनी फार वेगवेगळ्या आणि चुकीच्या पद्धतीचा मार्ग अवलंबला होता. जे ऐकून, तुम्हाला सुद्धा त्या लोकांची कीव करावीशी वाटेल.
स्वतःची लायकी नसताना, मोठाले पगार घेणारे लोकं. अशा नीच पातळीवर उतरतातच कसे..?
तर.. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी..
काही महिलांना एका अपत्या नंतर, गर्भाच्या पिशवीचा त्रास जाणवू लागला होता. अशा महिलांनी, डॉक्टरी उपचाराने गर्भाची पिशवी काढून टाकली होती. ज्यामुळे, त्यांना इथून पुढे अपत्य होणारच नव्हतं. गर्भाची पिशवी काढली नसती. तर त्यांनी, दुसऱ्या अपत्यासाठी नक्कीच प्रयत्न केले असते. परंतु अशा स्त्रियांनी सुद्धा, संततिनियमन केल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर करून या योजनेचा लाभ मिळवला होता.
तर काही पुरुषांनी, त्यांना दोन अपत्य असताना. संततिनियमन करून घेतलं होतं. पण दुर्दैवाने, त्यातील त्यांचं एक अपत्य अकाली मृत्यू पावलं. अशा लोकांनी सुद्धा, खोटी माहिती देऊन, या योजनेचा लाभ उचलला होता. खरं पाहायला गेलं तर, शासनाची फसवणूक करणं हा फार मोठा गुन्हा आहे. पण पैश्याच्या मोहापायी काही लोकांनी हि नालायक कामं सुद्धा केली.
पण काय आहे, भिंतीला सुद्धा कान असतात. या उक्तीप्रमाणे, माहितीच्या अधिकारात अशा लोकांची काही खरी माहिती असणाऱ्या लोकांनी. अशा व्यक्तींच्या खऱ्या माहितीचा पोलखोल केला. आणि हे सत्य समोर आल्यावर, महाराष्ट्र शासना कडून हि योजना ताबडतोब बंद करण्यात आली. ज्या लोकांनी खोट्या फाईल सबमिट करून, जो आर्थिक लाभ उचलला होता. तो त्यांच्याकडून वसूल करण्यात आला. आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली. असं माझ्या ऐकण्यात आलं आहे. आता हे कितपत खरं आहे, ते देवालाच माहिती.
काही नालायक व्यक्तींमुळे, या सरकारी योजनेचे जे कर्मचारी खरे लाभार्थी आहेत. ते व्यक्ती, या लाभापासून विनाकारणच वंचितच राहिले. आणि अजूनही, त्या विषयाची सरकार कडून ठोस अशी कोणतीच अमलबजावणी झाली नाहीये.
आपल्या देशातील लोकांना हेच समजत नाही. कि आपण जे करतोय ते योग्य आहे कि अयोग्य आहे. आपल्या नालायक पणामुळे, दुसऱ्या कोणाचं तरी नुकसान होऊ शकतं. याची कोणालाच जान नसते. तुम्ही मला सांगा, पैश्याचा हव्यास तरी किती असावा..?
आपल्या देशातील लोकांना हेच समजत नाही. कि आपण जे करतोय ते योग्य आहे कि अयोग्य आहे. आपल्या नालायक पणामुळे, दुसऱ्या कोणाचं तरी नुकसान होऊ शकतं. याची कोणालाच जान नसते. तुम्ही मला सांगा, पैश्याचा हव्यास तरी किती असावा..?
याला सुद्धा.. काही, मर्यादा असतात हो..!
No comments:
Post a Comment