Saturday, 10 June 2017

घरातील लाईट (वीज) गेली..!
इतर आठ महिन्यात कधीतरी, आणि..पावसाळ्यात तर, ती हमखास जातेच जाते.
मला माहिती आहे, हे वीज काम दुरुस्ती व्हायला वेळ हा लागतोच. फार जिकरीचे काम असते ते. भर पावसात, वीजजोड करणाऱ्या होतकरू कारागिरांना माझा अगदी मनापासून सलाम आहे. जीवावर बेतणारं काम आहे हो ते. परंतु, एक सेवा म्हणून ती लोकं अविरत झटत असतात.
लाईनवर कामं करणारे लोकं तर काम करत असतात.
परंतु.. नेहेमी लाईट जात नसल्याने, महावितरण मधील फोन अटेंडंटला. वर्षभर, म्हणावं इतकं काम नसतं.
आता कसं आहे.. शहरी लोकांना लाईट शिवाय बिलकुल जमत नाही. खेडूत लोकांनी तर, त्यांचा विषय सोडून दिला आहे. त्यामागे विविध कारणं सुद्धा आहेत.
तर मग, शहरी भागातील हवालदिल व्यक्ती..त्यांना वारंवार फोन करून विचारात असतात..!
साहेब..लाईट कधी येईल.?
अशा गंभीर प्रसंगी काही वेळेस, काही " लाईट " मारलेल्या व्यक्ती खूपच चिडलेल्या अवस्थेत असतात. त्यावेळी, ती " टाईट " लोकं.. त्या फोन अटेंडंटला " वाईट साईट " सुद्धा बोलतात.
माझ्या माहितीप्रमाणे, त्या अटेंडंट व्यक्तीने लोकांच्या तक्रारीचं समाधान करायला हवं आहे.
भले.. तो व्यक्ती टाईट असेल तरीही. कारण, फोनवर माणूस फक्त शाब्दिक मारा करत असतो. हाताने मारत नसतो. त्यामुळे, शाब्दिक मारा सहन करत, काही अंशी त्यांनी कोडगं व्हायला शिकलं पाहिजे. आमच्या कामात तर आमचे साहेब लोकं आम्हाला सर्रास म्हणत असतात. आपण अर्धा पगार शिव्या खायचा घेत असतो. आणि हि अगदी सत्य परिस्थिती आहे.
पण ही महावितरण मधील लोकं.. असं काही झालं, की लगेच फोन खाली ठेऊन देतात. आणि, आपल्या कामात दिरंगाई करतात. फोन लागत नसल्याने, लोकं हवालदिल होतात. मग कधीतरी मोर्चे वगैरे येतात. प्रसंगी संतापलेल्या जमावाकडून ऑफिस सुद्धा फोडलं जातं. मग याला जबाबदार कोण आहे. शिव्या खायला भिणारी लोकं मार खाऊ शकतील का..? किंवा फोडाफोडीत सरकारची झालेली नुकसानभरपाई देऊ शकतील का..?
अरे लेकहो.. कर्मधर्मसंयोगाने, तुम्हाला गरम खुर्चीची नोकरी मिळाली आहे. हे तुमचं नशीब समजा.
वर्षभर..तुम्हाला म्हणावं असं काहीच काम नसतं.
तर मग, वर्षातून एकदा काम म्हणून जनतेच्या शिव्या खायला तुमची कसली हरकत आहे हो.? आता ते शिव्या का देतात,
तर ते मालक आहेत. पैसा खर्च करत आहेत. त्यामुळे, तुम्ही तुमची जबाबदारी झटकू नका. शक्य तितकं त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. आणि हो.. हि तुमची ड्युटी आहे बरं का.
राग माणू नका.. लोभ ठेवाच..!
कारण, याच आम जनतेमुळे तुमच्या घरातील चूल पेटत आहे. हे तुम्ही कदापि विसरू नका. वीज बिल भरून कोणी तुमच्यावर उपकार करत नाही. हि सगळी कामं महावितरण पाहत असतं. आणि त्या विभागातील तुम्ही सुद्धा एक सन्माननीय नोकरवर्ग आहात. याचा कधीही विसर पडून देऊ नका. त्रास होईल, पण हे तुमचं कर्तव्य आहे.
निभाना तो पडेगा भाई..!

No comments:

Post a Comment