आमच्या संपूर्ण खानदानात,
घरच्यांच्या मनाविरुद्ध, त्यांना न सांगता, प्रेमविवाह केलेला पहिला व्यक्ती म्हणजे मी.
त्यामुळे, हा प्रकार घडल्यानंतर साहजिकच आमच्या घरात वाद आणि गोंधळ निर्माण होणार होता. एकत्र कुटुंब असल्याने, त्यात नक्कीच भरीस भर पडणार होती.
पण कसंबसं आमच्या घरच्यांनी आमची चूक पोटात घातली. आणि मोठ्या मनाने आम्हा दोघांना त्यांनी माफ केलं.
पण म्हणतात ना.. चहा पेक्षा किटली जास्ती गरम असते..!
त्यातला काहीसा प्रकार मला त्यावेळी पाहायला मिळाला. आमच्या ओळखीतल्या काही व्यक्तींनी, माझ्या लग्नावर नाराजी व्यक्त करत, आमच्या घरच्या व्यक्तींसमोर त्यांना खाली दाखवत, टोमणा देत, मला उद्देशून त्या दोन व्यक्ती असं म्हणाल्या होत्या.
घरच्यांच्या मनाविरुद्ध, त्यांना न सांगता, प्रेमविवाह केलेला पहिला व्यक्ती म्हणजे मी.
त्यामुळे, हा प्रकार घडल्यानंतर साहजिकच आमच्या घरात वाद आणि गोंधळ निर्माण होणार होता. एकत्र कुटुंब असल्याने, त्यात नक्कीच भरीस भर पडणार होती.
पण कसंबसं आमच्या घरच्यांनी आमची चूक पोटात घातली. आणि मोठ्या मनाने आम्हा दोघांना त्यांनी माफ केलं.
पण म्हणतात ना.. चहा पेक्षा किटली जास्ती गरम असते..!
त्यातला काहीसा प्रकार मला त्यावेळी पाहायला मिळाला. आमच्या ओळखीतल्या काही व्यक्तींनी, माझ्या लग्नावर नाराजी व्यक्त करत, आमच्या घरच्या व्यक्तींसमोर त्यांना खाली दाखवत, टोमणा देत, मला उद्देशून त्या दोन व्यक्ती असं म्हणाल्या होत्या.
आम्हाला वाटलं नव्हतं, हा असलं काही करेल म्हणून..!
त्यांचे हे शब्द माझ्या फारच जिव्हारी लागले होते. अगदी, उकळत्या तेलासारखे ते माझ्या कानात पडत होते. आमच्या घरचे काही म्हणत नव्हते. पण त्यावेळी, बाहेरच्यांना खूप जोर आला होता.
पण लहान तोंडी मोठा घास कसा घ्यावा. म्हणून त्यावेळी हाताच्या मुठी आवळून मी गप्पं बसलो होतो.
पण कसं असतं, आपण लोकाकडे जेंव्हा एक बोट करत असतो. त्यावेळी उरलेली तीन बोटं आपल्याकडे अंगुलीनिर्देश करत असतात. हे आपण विसरून जात असतो.
पण लहान तोंडी मोठा घास कसा घ्यावा. म्हणून त्यावेळी हाताच्या मुठी आवळून मी गप्पं बसलो होतो.
पण कसं असतं, आपण लोकाकडे जेंव्हा एक बोट करत असतो. त्यावेळी उरलेली तीन बोटं आपल्याकडे अंगुलीनिर्देश करत असतात. हे आपण विसरून जात असतो.
बराच काळ लोटल्यानंतर..
त्या दोन्ही व्यक्तींच्या घरी सुद्धा अगदी असाच प्रकार घडला. त्यातील एका व्यक्तीच्या घरी, मास मच्छी असला विषय बिलकुल चालत नव्हता. त्याच्या मुलाने, उत्तर भारतातल्या एका मुलीशी लग्न केलं होतं. आणि तिच्या सवयीमुळे, तो सुद्धा आता खायला प्यायला लागला होता. आणि विशेष म्हणजे, एकुलता एक असून आई वडिलांना सांभाळत नव्हता.
तर दुसऱ्या केसमध्ये, सुरवातीला त्याच्या मुलीने प्रेमविवाह केला होता. आणि हे का कमी म्हणून, दोन चार वर्षातच, त्याच्या मुलाने सुद्धा बहिणीच्या पायावर पाय टाकला होता.
त्या दोन्ही व्यक्तींच्या घरी सुद्धा अगदी असाच प्रकार घडला. त्यातील एका व्यक्तीच्या घरी, मास मच्छी असला विषय बिलकुल चालत नव्हता. त्याच्या मुलाने, उत्तर भारतातल्या एका मुलीशी लग्न केलं होतं. आणि तिच्या सवयीमुळे, तो सुद्धा आता खायला प्यायला लागला होता. आणि विशेष म्हणजे, एकुलता एक असून आई वडिलांना सांभाळत नव्हता.
तर दुसऱ्या केसमध्ये, सुरवातीला त्याच्या मुलीने प्रेमविवाह केला होता. आणि हे का कमी म्हणून, दोन चार वर्षातच, त्याच्या मुलाने सुद्धा बहिणीच्या पायावर पाय टाकला होता.
यथावकाश.. या दोन्ही घटना माझ्या कानावर आल्या. मी तर संधीची वाटच पाहत होतो.
आणि, एकदा पहिल्या क्रमांकाची व्यक्ती मला भेटली.
अशावेळी, मी कोणतीच भीडभाड ठेवत नसतो. आणि, समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करायला बिलकुल मागेपुढे पाहत नसतो. त्यावेळी मी त्या व्यक्तीला म्हणालो..
आणि, एकदा पहिल्या क्रमांकाची व्यक्ती मला भेटली.
अशावेळी, मी कोणतीच भीडभाड ठेवत नसतो. आणि, समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करायला बिलकुल मागेपुढे पाहत नसतो. त्यावेळी मी त्या व्यक्तीला म्हणालो..
काय काका.. तुमच्या दीपेशने खूप डेंजर काम केलं हो. तुम्ही लोकं शुद्ध शाकाहारी मंडळी. आणि त्याने चक्क मांसाहार करणाऱ्या मुलीशी लग्नं केलं. आणि हल्ली तो, मांसाहारा सोबतच कधीतरी दारू सुद्धा पितो असं सुद्धा माझ्या ऐकण्यात आलं आहे. खरं आहे का हे..?
मी त्या व्यक्तीचं इतकं बेक्कार तोंड झोडल्यावर, गडी माझ्यापुढे कसला बोलतोय. मान खाली घालून गप्पं उभा होता. आणि शेवटी, त्याचा शालजोडीतला फटका मी त्याला मारलाच.
मी त्या व्यक्तीचं इतकं बेक्कार तोंड झोडल्यावर, गडी माझ्यापुढे कसला बोलतोय. मान खाली घालून गप्पं उभा होता. आणि शेवटी, त्याचा शालजोडीतला फटका मी त्याला मारलाच.
मला वाटलं नव्हतं, तो असं काही करेल म्हणून..!
असला जबरदस्त अपमान केल्यानंतर, तो पुन्हा फिरून मला कधीच भेटला नाही. एकदोनदा कार्यक्रमात दिसला होता, पण मला पाहून तोंड लपवत होता.
तर.. दुसऱ्या केसमध्ये, त्या व्यक्तीच्या मुलीने पळून जाऊन लग्नं केलं होतं. मुलीचा विषय होता, म्हणून सुरवातीला मी त्याला काही बोललो नाही. पण जेंव्हा त्याच्या मुलाने बापाच्या विरोधाला न जुमानता आपलं प्रेम तडीस नेलं. त्यावेळी एकदा मी त्याला सुद्धा गाठला. आणि म्हणालो,
आमच्या घरात तर, मी एकट्यानेच असं लग्नं केलं होतं. पण तुमच्या घरात, तुमच्या दोन्ही मुलांनी दिवे लावले. मला स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं कि दोघे असं काही करतील म्हणून..!
वरील दोन्ही प्रकरणात.. त्या दोन्ही व्यक्ती, माझे टोमणे ऐकत खाली मान घालून उभे होते.
पण त्या दोघांना मला उलट बोलायची हिम्मत काही होत नव्हती.
कारण, त्यावेळी माझ्याकडे एक बोट करताना. त्यांच्या हाताच्या तिन्ही बोटांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं. त्यामुळे, लोकांवर शिंतोडे उडवताना कधीही सावध असलं पाहिजे. वेळ काही सांगून येत नाही, आपल्या अंगावर कधी एखादी मोठी घाण पडेल. आणि, कधी एकदा आपण त्यात पुरते गुदमरून जाऊ ते सुद्धा सांगता येत नाही..!
पण त्या दोघांना मला उलट बोलायची हिम्मत काही होत नव्हती.
कारण, त्यावेळी माझ्याकडे एक बोट करताना. त्यांच्या हाताच्या तिन्ही बोटांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं. त्यामुळे, लोकांवर शिंतोडे उडवताना कधीही सावध असलं पाहिजे. वेळ काही सांगून येत नाही, आपल्या अंगावर कधी एखादी मोठी घाण पडेल. आणि, कधी एकदा आपण त्यात पुरते गुदमरून जाऊ ते सुद्धा सांगता येत नाही..!
No comments:
Post a Comment