Thursday, 13 July 2017

दारू, मदिरा, वारुणी किंवा इंग्रजी वाईन..!
हि..खरोखर वाईट नाहीये हो. तुम्ही आम्ही तिला विनाकारण बदनाम केलं आहे..!
ज्यावेळी.. समुद्रमंथन झालं, तेंव्हा त्या मंथनात इतर चौदा महा रत्नांबरोबरच नवव्या चरणात मदिरा सुद्धा प्राप्त झाली होती. मंथन केल्यानंतर, ज्या वस्तू प्राप्त होतात. त्या निश्चितच अमुल्य असतात. यात कोणाचंच दुमत नसावं.
त्यामुळे, अमृत सहजासहजी प्राप्त होत नसल्याने. काही व्यक्तींनी मदिराक्षीला आपल्या जवळ केलं.
परंतु कसं आहे, प्रत्येक विषय हा अगदी हिशोबात व्हायला हवा. आणि, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला. कि त्याला व्यसनाचं स्वरूप हे प्राप्त होतच. हे अपना सर्वांना माहितीच आहे.
स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, हे सुद्धा कधीकाळी मदिरेचे खूप शौकीन होते. हे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसेल, किंवा असेल सुद्धा. पण, त्यांनी गायलेली सर्वच गीतं अजरामर झाली आहेत. आणि, त्यातील कितीतरी गीतं त्यांनी चक्क मदिरा प्राशन करून म्हंटलेली आहेत. काही लोकांना हि फार मोठी अतिशयोक्ती वाटेल. पण, हे सगळं खरं आहे.
मृत्युंजयकार शिवाजी सावंत, हे सुद्धा वारुणीचे खूप शौकीन होते.
माझ्या सोबत कामाला असणाऱ्या एका मित्राने एकदा मला सांगितलं होतं. पुण्यात असताना, एकदा त्यांना मदिरेचा अतिरिक्त डोस झाला होता. त्यावेळी, त्यांना घरी सोडण्याच, त्याला सौभाग्य मिळालं होतं.
योग लाख चांगला आहे.
पण.. पुण्यातील योगमहर्षी अयंगार सर योग विद्या शिकून आणि इतरांना त्याची शिकवन देऊन, वयाच्या शहाण्णव्या वर्षापर्यंत जीवित राहिले होते. आणि त्याच ठिकाणी.. पद्मविभूषण प्राप्त नामांकित पत्रकार, कादंबरीकार आणि राजकारणी श्री. खुशवंत सिंग हे रोजच्या रोज काही प्रमाणात मदिरा प्राशन करून वयाच्या नव्व्यानव्या वर्षी स्वर्गवासी झाले.
आता.. हि तर झाली फार मोठी उदाहरणं.
आणि अजून असे कित्तेक लोकं असतील. ज्यांनी वारुनी पिऊन खूप चांगल्या आणि मोठमोठ्या कामगिऱ्या सुद्धा बजावल्या असतील.
" माझ्या सांगण्याचा हा मुळीच उद्देश नाहीये. असं काही चांगलं होत असल्याने, सर्वांनी दारू प्यावी आणि हवा तसा धुडगूस घालावा..! "
शेवटी नाण्याला दोन बाजू असतातच, या दारूपायी कितीतरी मोठमोठे सिनेअभिनेते आणि अभिनेत्र्या नशेच्या गर्तेत जाऊन देशोधडीला मिळाले आहेत.
पण विनाकारण, कारण नसताना कोणत्याही गोष्टीला नावं ठेऊ नये. दारूच्या आहारी जाणारी लोकं निव्वळ नालायक असतात. माणूस बेवडा का होतो..?
या प्रश्नाचं आजही मला उत्तर सापडलं नाहीये. कधी कधी डॉक्टर मंडळी सुद्धा काही उपचारासाठी त्यांच्या रुग्णांना मदिरा प्राशन करायला सांगतात. त्याचं कारण म्हणजे, त्यात काहीतरी औषधी गुणधर्म असेलच ना. शेवटी काय आहे, अति तिथे माती हा विषय सर्वश्रुत आहे.
काही अतीहुशार लोकं तर, तिला.. द्राक्षासव किंवा टोनिक म्हणून सुद्धा खुलेआम पीत असतात. अशा लोकांना सुद्धा तुम्ही नक्की टार्गेट करा.
तुमच्या माहितीकरीता म्हणून सांगतो. आजवर, खूप मोठ्या आशयाचे आणि विषयाचे मी शेकोडो लेख लिहिले आहेत. त्यातील बऱ्याच लेखांना या माध्यमात फार मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. माझे काही निवडक लेख तर, अगदी वर्तमानपत्रात, दिवाळी अंकात सुद्धा छापून आले आहेत.
परंतु..त्यातील कित्तेक लेख, हे मी मदिरा प्राशन करून लिहिले आहेत. हे कोणालाही सांगून सुद्धा पटणार नाही. मागे वळून पाहताना, कधी कधी मला सुद्धा काही प्रश्न पडतात. कि इतक्या उच्च कोटीचे ते लेख मीच लिहिले आहेत का..?
पण न जाणो का, त्या विषयात एक वेगळीच कशीश आहे. मदिरा या विषयाला वाईट म्हणून पाहू नका. आणि तिचा वापर करताना अतिरेक सुद्धा करू नका. अल्प प्रमाणात मदिरा प्राशन केल्याने, तिच्या औषधी गुणधर्मामुळे, मनाची कवाडं उघडली जातात. मनुष्याचा अतिरिक्त ताण नाहीसा होतो. मनुष्य एका वेगळ्याच विश्वात संचार करतो. पण हे सगळं काही अल्प प्रमाणात असेल तरच. नाहीतर, अति प्रमाणात मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तीचं आणि त्याच्या कुटुंबियाचं जीवन अंधकारमय झाल्याशिवाय राहणार नाही. अति लाड सुद्धा, कधी कधी महागात पडतात..!
मित्रहो, खरोखर राग माणू नका..
जे आहे, ते अगदी खरं आहे. आणि खऱ्याला कधीही मरण नसतं.!

No comments:

Post a Comment