काही तरुण मुलं,
कोण्या एखाद्या धनाढ्य किंवा सक्सेसफुल व्यक्तीला आपला आयडॉल मानून.
स्वतःच्या करीयरच्या इतके मागे लागतात.
कि, त्या अतिश्रीमंतीच्या एकमेव ध्यासाने ते अगदी झपाटले जातात.
त्यांना, करियर नावाचं एकप्रकारचं व्यसनच लागून जातं. फक्त काम एके काम, किंवा करियर एके करियर. एवढाच विषय त्यांच्या डोक्यात घोंगावत असतो.
कोण्या एखाद्या धनाढ्य किंवा सक्सेसफुल व्यक्तीला आपला आयडॉल मानून.
स्वतःच्या करीयरच्या इतके मागे लागतात.
कि, त्या अतिश्रीमंतीच्या एकमेव ध्यासाने ते अगदी झपाटले जातात.
त्यांना, करियर नावाचं एकप्रकारचं व्यसनच लागून जातं. फक्त काम एके काम, किंवा करियर एके करियर. एवढाच विषय त्यांच्या डोक्यात घोंगावत असतो.
आणि..महत्प्रयासाने, त्यांच्या जीवनात शेवटी तो दिवस उजाडतो..!
आज, त्यांच्यासमोर सगळी सुखं अगदी हात जोडून उभी असतात. मोठ्या पगाराची नोकरी, बंगला, गाडी, भलामोठा बँक बॅलन्स असतो. परंतु मागे वळून पाहत असताना, त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे,
हे सगळं भौतिक सुख मिळवत असताना..
आपलं वय बरच पुढे निघून गेलं आहे. चेहर्यावरील तेज थोडं कमी झालं आहे, केस सुद्धा कपाळाच्या बरेच मागे जाऊ लागले आहेत. त्यातील काही केसांनी तर, अगदी चंदेरी रंग सुद्धा धारण केला आहे. पण, त्या करियर करण्याच्या नादात ते अगदी बेभान झालेले असतात. त्यावेळी यांच्या मनात दुसरा कोणताच विचार येत नसतो.
हे सगळं भौतिक सुख मिळवत असताना..
आपलं वय बरच पुढे निघून गेलं आहे. चेहर्यावरील तेज थोडं कमी झालं आहे, केस सुद्धा कपाळाच्या बरेच मागे जाऊ लागले आहेत. त्यातील काही केसांनी तर, अगदी चंदेरी रंग सुद्धा धारण केला आहे. पण, त्या करियर करण्याच्या नादात ते अगदी बेभान झालेले असतात. त्यावेळी यांच्या मनात दुसरा कोणताच विचार येत नसतो.
परंतु.. आता मात्र तो हवाहवासा शारीरिक आणि मानसिक विचार त्यांच्या नजरेसमोर अगदी पिंगा घालू लागलेला असतो.
त्यांच्या इतर मित्र मैत्रिणींची लग्न झालेली असतात. त्यांच्या घरात बच्चेकंपनी गोंधळ घालत असतात. त्यावेळी भानावर येऊन, हि लोकं सुद्धा मुख्य प्रवाहात येऊ पाहत असतात. पण त्यावेळी, खरोखर वेळ निघून गेलेली असते. मग काय, सगळीकडे एकच धावपळ सुरु होते.
त्यांच्या इतर मित्र मैत्रिणींची लग्न झालेली असतात. त्यांच्या घरात बच्चेकंपनी गोंधळ घालत असतात. त्यावेळी भानावर येऊन, हि लोकं सुद्धा मुख्य प्रवाहात येऊ पाहत असतात. पण त्यावेळी, खरोखर वेळ निघून गेलेली असते. मग काय, सगळीकडे एकच धावपळ सुरु होते.
मुलगा उपवर झाला आहे / कि, मुलगा वयस्कर झाला आहे..?
आजच्या जमान्यात, माल आहे तर ताल आहे.
आणि, अशा अतिरिक्त मालदार लोकांना तर लग्न बाजारात प्रचंड मागणी असते. मग काय, सगळीकडच्या नातेवाईकांना फक्त हे एकमेव लग्न जुळवायचे वेद लागलेले असतात. आता, या मुलाच्या अपेक्षा सुद्धा अगदी अव्वाच्या सव्वा असतात.
यांना अगदी कोवळ्या वयाची मुलगी हवी असते. अगदी मॉडर्न, चारचौघांत उठून दिसणारी, ठसठशीत बांध्याची मुलगी यांना सहचरणी म्हणून हवी असते. आणि, त्या लक्ष्मी पुत्रासमोर या सगळ्या गोष्टी अगदी हात जोडून आणि लोटांगण घालत येत असतात.
आणि, अशा अतिरिक्त मालदार लोकांना तर लग्न बाजारात प्रचंड मागणी असते. मग काय, सगळीकडच्या नातेवाईकांना फक्त हे एकमेव लग्न जुळवायचे वेद लागलेले असतात. आता, या मुलाच्या अपेक्षा सुद्धा अगदी अव्वाच्या सव्वा असतात.
यांना अगदी कोवळ्या वयाची मुलगी हवी असते. अगदी मॉडर्न, चारचौघांत उठून दिसणारी, ठसठशीत बांध्याची मुलगी यांना सहचरणी म्हणून हवी असते. आणि, त्या लक्ष्मी पुत्रासमोर या सगळ्या गोष्टी अगदी हात जोडून आणि लोटांगण घालत येत असतात.
हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर, एकदाचा तो विवाह संपन्न होतो. नव्याची नवलाई संपते. पण काही काळानंतर, या व्यक्तीच्या मानगुटीवर एक नवीनच भूत सवार होतं. याच्या वाढत्या वयाची त्याला जाणीव होऊ लागलेली असते. आणि, नको त्या विचाराने तो पक्का ग्रासला जातो.
" माझी सुंदर बायको, कोण्या दुसऱ्या व्यक्तीवर लट्टू झाली तर..? "
कारण, याच्या आणि तिच्या वयामध्ये बरच अंतर असतं. ती अगदी कोवळी काकडी, तर हा म्हणजे अगदी जाडजूड आणि पिकलेला भोपळा झालेला असतो.
याला घरातून बाहेर कामावर जाताना टेन्शन, कुठे फिरायला जाताना टेन्शन. अशा व्यक्ती, ज्यावेळी बायकोला सोबत घेऊन बाईकवरून फिरायला जात असतात.
त्यावेळी, सिग्नलवर उभे असताना यांचं लक्ष अगदी चारी बाजूला असतं. माझ्या बायकोकडे कोणी पाहत तर नाही ना..? तिच्यावर, कोणी युवक लाईन तर मारत नाही ना..? या आणि इतर बऱ्याच प्रश्नांनी तो पुरता भंडावून गेलेला असतो.
त्याकरिता..योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. मनाला हवा तसा योग्य निर्णय न घेता, खरोखर फार मोठं करियर करून. या, आणि अशाच प्रकारच्या इतर यातना जर भोगाव्या लागणार असतील.
याला घरातून बाहेर कामावर जाताना टेन्शन, कुठे फिरायला जाताना टेन्शन. अशा व्यक्ती, ज्यावेळी बायकोला सोबत घेऊन बाईकवरून फिरायला जात असतात.
त्यावेळी, सिग्नलवर उभे असताना यांचं लक्ष अगदी चारी बाजूला असतं. माझ्या बायकोकडे कोणी पाहत तर नाही ना..? तिच्यावर, कोणी युवक लाईन तर मारत नाही ना..? या आणि इतर बऱ्याच प्रश्नांनी तो पुरता भंडावून गेलेला असतो.
त्याकरिता..योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. मनाला हवा तसा योग्य निर्णय न घेता, खरोखर फार मोठं करियर करून. या, आणि अशाच प्रकारच्या इतर यातना जर भोगाव्या लागणार असतील.
तर, एवढ्या मोठ्या हिकमतीने कमवलेल्या त्या करियरला काय काडी लावायची आहे का..?
मनुष्य जन्म पुन्हा नाही, गेला दिवस परत येणार नाही, आज कमावलेली संपत्ती उद्या कामाला येईलच, याची सुद्धा शश्वती देता येत नाही. आज असणारं सौंदर्य, उद्या असेलच असं कोणालाही छातीठोकपणे सांगता येणार नाही. जीवनात, योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला शिका.
जीवन, खरोखर खूप सुंदर होईल..!
No comments:
Post a Comment