Thursday, 13 July 2017

काय तर म्हणे..
पुण्यात फार मोठं आय टी सेक्टर झालंय..
अरे मी तर म्हणतोय.. ती ब्याद पुण्यात आलीच कशाला..?
एकतर.. आम्ही पुणेकर आहे त्यात खूप सुखी समाधानी होतो, आणि आहोत. अर्ध्या भाकरीत, आम्ही तेवढीच मज्जा करतो. जेवढी, काही लोकं चिकन तंदुरी खाऊन करत असतात.
पुण्यात आय टी सेक्टर आलं काय, आणि आमच्या सांस्कृतिक आणि दर्जेदार पुण्याचा भाव वाढला काय..!
वाढूदेत, भाव तर वाढलेच पाहिजे..! पण त्याचा प्रत्यक्ष लाभ कोण घेतय..?
आम्ही लोकं, पूर्वीपासून अगदी सरळसोट जगणारी माणसं. मग आमची मुलं आमच्याच पावलावर पावूल टाकणार ना. त्यात त्यांची तरी काय चूक..?
मोठमोठ्या आय.टी. कंपन्यांमध्ये,
शर्मा, रेड्डी,तिवारी, नायर, पांडे हि काही मोजकी नावं झाली. अजून सुद्धा बरीच नावं आहेत.
परंतु ती मुख्य प्रवाहात नाहीयेत.
मग आमची.. पाटील, कांबळे, शिंदे, जाधव कुठे गेले..?
तेच सांगतोय.. आमच्या इथे शिकलेली काही मराठी मुलं, त्या परप्रांतीयांच्या हाताखाली काम करण्यात समाधान मानतात. कारण.. पर्याय नाहीये ना.
नॉर्थ, साऊथ आणि कोलकाता या भागातील हाय फाय मुलांना इथे सर्वात पाहिलं प्राधान्य मिळत असतं. मित्रहो, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. हा अशातला भाग नाहीये बर का. हे सगळं पाहतोय मी.
मला तर माझ्या मातृभूमीत स्वतःचं घर सुद्धा घेत येत नव्हतं. इतक्या भयंकर किमती झाल्या आहेत. पण झालं कसंतरी..
पण आजच्या शिकलेल्या पोरांची तरी कंडीशन काय आहे हो..?
भारतात राहून, विदेशी लोकांची चाकरी करून त्यांना मजबूत पगार मिळतोय.
पण.. त्या पगाराचं बर्डन किती आहे..!
मला तर, त्यातील एकही मुलगा किंवा मुलगी सुखी वाटत नाहीये. पैसा मिळतोय म्हणून काम करतायेत. आणि, स्ट्रेस घालवण्यासाठी दारू, सिगारेट सारख्या व्यसनांना जवळ करत आहेत. पैसा एके पैसा असं त्यांचं लाईफ झालं आहे.
नवरा फर्स्ट शिपला तर बायको सेकंड किंवा नाईट शिफ्टला असते. त्यामुळे, अगदी योगायोगाने त्यांचं मिलन होतं. आणि झालंच तर, स्ट्रेस मुळे त्यांच्यात शाब्दिक चकमकी घडत असतात. आणि खरं प्रेम शोधण्यासाठी ते झगडत राहतात.
मग अशावेळी.. त्यांना सुख देणारा किंवा देणारी कोणीतरी मिळून जाते. पण तो मुलगा किंवा ती मुलगी कोणत्या सोसायटीची असते. याचं कोणालाच भान राहत नाही.
कितीतरी आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुलींना, निव्वळ उपभोग मिळतोय म्हणून स्लम मध्ये राहत असणाऱ्या टापटीप मुलांबरोबर मज्जा मारताना मी स्वतः पाहिलं आहे. आणि त्यानंतर, त्या मुलांनी त्यांची केलेली पिळवणूक सुद्धा पहिली आहे.
नाही राव.. हे सगळं काही, किमान माझ्या तरी डोक्या बाहेरचं आहे. पूर्वी पुणे हे सायकलींचं शहर होतं. तेच खूप भारी होतं. आता तेच पुणं, डूकाटीचं पुणं म्हणून ओळखलं जातंय.
पण त्या डूकाटी पुणेकर किंवा माझा महाराष्ट्रीयन नाही, तर कोणीतरी भलतंच उडवतय.
हे पाहून सुद्धा, माझ्या मनाची बरीच घालमेल होत आहे..!

No comments:

Post a Comment